शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पूर्ण होतील सात सिंचन प्रकल्प

By admin | Updated: May 12, 2016 03:56 IST

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा अंदाजित खर्च ३६२९८ कोटी रुपये आहे. या २६ पैकी ७ प्रकल्प चालू वर्षातच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जल संसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. प्रा. जाट म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रातील वाघूर (खर्च १२३३ कोटी रुपये), बावनथडी (आयएस) (७३९ कोटी), लोअर दुधना (१५५२ कोटी), तिल्लारी (६५६ कोटी), लोअर वर्धा (१९१२ कोटी), लोअर पंजारा (२९५ कोटी) आणि नांदूर मधमेश्वर, दुसरा टप्पा (२०.५० कोटी) हे सात सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील. या प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.याशिवाय २०२० पर्यंत ज्या सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे, त्यात गोसेखुर्द (एनपी) (खर्च १३३६६ कोटीे), अप्पर पैनगंगा (१५१२ कोटी), बेंबळा (३०५७ कोटी), तराळी (८१६ कोटी), धोम बालकवाडी (७५१ कोटी), अर्जुना (६४२ कोटी रुपये), अप्पर कुंडलिका (२७४ कोटी), अरुणा (५८८ कोटी), कृष्णा कोयना लिफ्ट (२३२८ कोटी), गडनदी (३७.५५ कोटी), सांगोला शाखा कालवा (८०६ कोटी), खडकपूर्णा १३४८ कोटी), वारणा (१०६३ कोटी), मोरना (गुरेघर) (१८३ कोटी), लोअर पेंदी (१०७१ कोटी), वांग प्रकल्प (१९४ कोटी), नरदेव (मोहम्मदवाडी) (२५३ कोटी) आणि कडिली (३२४ कोटी) यांचा समावेश आहे, असे प्रा. जाट यांनी सांगितले.