शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 11:14 IST

जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधान कलम 35-Aवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुनावणीच्या आधी यासिनला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 35-A कलमाअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये इतर कोणत्याही राज्यातील वा राष्ट्रातील व्यक्तीला अचल संपत्ती खरेदी करण्यास मनाई आहे. संविधानाच्या याच कलमाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते पाकिस्तान सरकारशी संपर्कात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारनं त्यांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्यातील पोलीस व निमलष्करी दलाला अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारनं काही फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. संरक्षण काढून घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मीरवाइझ उमर फारुख, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोनस हाशमी कुरैशी आणि शब्बीर शाह यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये यासिन मलिकचाही समावेश होता. या नेत्यांपैकी मीवराइझ उमर फारुख हा हुर्रियत कॉन्फ्ररन्स या फुटीरतावादी पक्षाचा चेअरमन आहे.  या नेत्यांना देण्यात आलेले सरकारी संरक्षण काढतानाच त्यांना मिळणाऱ्या इतर सरकारी सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावर अब्दुल गनी बट्ट याने आपल्याला सुरक्षेची गरजच नव्हती, त्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याने काही फरक पडणार नाही, अशा उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. तसेच भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यताही त्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे. अब्दुल गनी बट्ट याने एएनआयला दिलेल्या माहितीमध्ये त्याने आपल्याला सुरक्षा राज्य सरकारने पुरविली होती. आपल्याला या सुरक्षेची गरज नव्हती. काश्मीरी जनताच आपली सुरक्षा आहे. आधी पाकिस्तान आणि भारताने त्यांचा युद्धाचा प्रश्न सोडवावा, अशी फुशारकी मारली आहे.

टॅग्स :ArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीर