शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

येत्या 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:13 IST

टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्देयेत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईलदक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली, दि. 30 - टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र येत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मांडलं आहे. दक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडलेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान 100 रुपये किलो आहेत. मंत्रालयाच्या 29 जून रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 92 रुपये किलो, कोलकात्यात 95 रुपये, मुंबईत 80 रुपये आणि चेन्नईत 55 रुपये किलो असे दर आहेत. अन्य शहरात लखनऊमध्ये 95 रुपये, भोपाळ व तिरुवनंतपुरम 90 रुपये, अहमदाबाद 65 रुपये, जयपूर 60 रुपये, पाटणा 60 रुपये आणि हैदराबाद 55 रुपये किलो असे दर आहेत.ज्या भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन होते त्या भागातही दर वाढलेले आहेत. शिमला येथे 83 रुपये, बंगळुरुत 75 रुपये किलोने विक्री होत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (फलोत्पादन विभाग) ए. के. सिंह यांनी सांगितले की, दक्षिण आणि अन्य उत्पादक राज्यांतून आवक वाढल्यानंतर येत्या 15 दिवसांत टोमॅटोचे दर खाली येतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतून आवक वाढू शकेल. त्यामुळे साहजिकच दर कमी होतील. सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि राजस्थान व अन्य उत्पादक राज्यांत झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. तसेच मालवाहतुकीशी संबंधित काही समस्यांमुळे टोमॅटो वेळेवर बाजारात आले नाहीत.पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चेंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आवक वाढू शकेल. 2016-17 या वर्षात म्हणजेच जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन 15 टक्के अधिक 187 लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.