शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

येत्या 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:13 IST

टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्देयेत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईलदक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली, दि. 30 - टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र येत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मांडलं आहे. दक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडलेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान 100 रुपये किलो आहेत. मंत्रालयाच्या 29 जून रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 92 रुपये किलो, कोलकात्यात 95 रुपये, मुंबईत 80 रुपये आणि चेन्नईत 55 रुपये किलो असे दर आहेत. अन्य शहरात लखनऊमध्ये 95 रुपये, भोपाळ व तिरुवनंतपुरम 90 रुपये, अहमदाबाद 65 रुपये, जयपूर 60 रुपये, पाटणा 60 रुपये आणि हैदराबाद 55 रुपये किलो असे दर आहेत.ज्या भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन होते त्या भागातही दर वाढलेले आहेत. शिमला येथे 83 रुपये, बंगळुरुत 75 रुपये किलोने विक्री होत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (फलोत्पादन विभाग) ए. के. सिंह यांनी सांगितले की, दक्षिण आणि अन्य उत्पादक राज्यांतून आवक वाढल्यानंतर येत्या 15 दिवसांत टोमॅटोचे दर खाली येतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतून आवक वाढू शकेल. त्यामुळे साहजिकच दर कमी होतील. सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि राजस्थान व अन्य उत्पादक राज्यांत झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. तसेच मालवाहतुकीशी संबंधित काही समस्यांमुळे टोमॅटो वेळेवर बाजारात आले नाहीत.पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चेंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आवक वाढू शकेल. 2016-17 या वर्षात म्हणजेच जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन 15 टक्के अधिक 187 लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.