शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

तातडीच्या कामकाजाची चुकीची प्रथा (मागे डोकावताना)

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

नामदेव मोरे

नामदेव मोरे
नवी मुंबई : महापालिकेमध्ये कायद्यामधील तरतुदींचा सोयीप्रमाणे वापर करण्याची प्रथा पडली आहे. धोरणात्मक निर्णयांचे ठराव सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचे विषय म्हणून सादर केले जात असून करोडो रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये जादा विषय म्हणून केल्याने अभ्यासासाठी सदस्यांना वेळ मिळत नसल्याने ते चर्चेविना त्रुटींसह प्रस्ताव मंजूर केले जात आहेत.
पालिकेच्या कामकाजामध्ये सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरातील विकासकामांच्या प्रस्तावांना व धोरणांना या सभेमध्ये मंजुरी दिली जाते. शहराच्या विकासाची दिशा या सभागृहात ठरली जाते. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी सभेच्या आठ दिवस अगोदर कार्यक्रम पत्रिका सर्व नगरसेवकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. नियमाप्रमाणे याविषयीचे सोपस्कार पार पाडले जातात. परंतु आठ दिवसांपूर्वीची कार्यक्रम पत्रिका व प्रत्यक्षात सभागृहात मांडलेले विषय यामध्ये खूप फरक असतो. अनेक महत्त्वाचे विषय मूळ कार्यक्रम पत्रिकेवर नसतात. ते आयत्या वेळचे कामकाज म्हणून सादर केले जातात. अचानक सभागृहासमोर आलेल्या या विषयांचा अभ्यास नसल्याने पुरेशा चर्चेविना प्रस्ताव मंजूर होतात. प्रस्तावांवर मोठ्या प्रमाणात चुका होतात. या चुकांचे परिणाम शहरवासीयांना वर्षानुवर्षे भोगावे लागतात. शहरातील रुग्णालय, सुपरस्पेशालिटी उपचार पद्धत, मोरबे धरण परिसरातील वीजनिर्मिती प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व इतर अनेक विषय अशाप्रकारे सादर करण्यात आले. सुपरस्पेशालिटीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. स्वस्त दरातील पाणी योजनेचाही बोजवारा उडाला आहे. गत पाच वर्षांमध्ये तब्बल ३१५ प्रस्ताव आयत्या वेळचा विषय म्हणून सादर केले आहेत. प्रत्येक सभेमध्ये ५ ते ७ विषय आयत्यावेळी मांडले जात आहेत. शेवटच्या सभेमध्ये काही प्रस्तावांची विषयपत्रिका नगरसेवकांपर्यंत पोहचलीच नसताना ठराव मंजूर करण्यात आले.
एखादा विषय खूपच तातडीचा असेल तर तो आयत्यावेळी सभागृहात आणण्यास काहीच हरकत नाही. परंतु धोरण ठरविण्याचा किंवा करोडो रुपयांचे विषय तातडीने मांडून मंजूर करणे शहराच्या हिताचे नाही. विषयांवर जास्त चर्चा होऊ नये. विषय वादग्रस्त ठरू नये यासाठी कायद्यातील तरतुदींचा चुकीचा वापर करून महत्त्वाचे विषय तत्काळ मंजूर करण्याची सवय २३ वर्षांमध्ये वाढतच गेली आहे. विरोधक सभागृहात अनेक वेळा याविषयी आवाज उठवितात. परंतु सभा संपली की पुन्हा याविषयी कधीच पाठपुरावा केला जात नाही. यामुळे सत्ताधारी जसे यास जबाबदार आहेत तसेच विरोधकांच्या धरसोड वृत्तीमुळे हे प्रकार होत आहेत.
चौकट
शेवटच्या सभेतील गोंधळ
स्थायी समितीची शेवटची सभा तीन टप्प्यांत घेण्यात आली. आयत्या वेळी अनेक विषय मांडले गेले व मंजूरही करण्यात आले. काही विषयांची पत्रिकाही सदस्यांना देण्यात आली नाही. सभापतींनी विषय मंजुरीसाठी टाकला व सर्वसहमतीने मंजूरही केला. सत्ताधारी व विरोधक कोणीच याविषयी आवाज उठविला नव्हता.
..........
वाचली - नारायण जाधव