शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

७५० रुपये लिहून, २०० देतात; ‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 06:59 IST

‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का; भारत न्याय यात्रा ओडिशात

राऊरकेला (ओडिशा) : ‘आम्ही मनरेगाच्या कामावर मजुरी करतो; परंतु आम्हाला वेळेवर त्याचे पैसे मिळत नाहीत,’ अशी खंत जेव्हा मनरेगाच्या मजुरांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवादादरम्यान व्यक्त केली तेव्हा त्यांना धक्का बसला. ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त राज्यात आलेल्या राहुल गांधी यांनी या मजुरांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्थानिक महिला मजुरांशी संवाद साधला. ‘कंत्राटदार काम करून घेतात; पण पैसे वेळेवर देत नाहीत. मी ३०-३५ दिवस काम केले. त्यानंतर आता एक वर्ष झाले तरी त्याचे पैसे मिळाले नाही. कंत्राटदार बाहेरून मजूर आणतात, त्यामुळे आम्हाला काम मिळत नाही. डायरीत ७५० रुपये दिल्याची नोंद करतात; पण प्रत्यक्षात २०० रुपयेच देतात,’ अशी खंत एका महिलेने व्यक्त केली. यासंदर्भातील व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया एक्सच्या खात्यावर शेअर केला असून, त्यात हा अन्याय असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यात म्हटले आहे.

भाजप-बीजेडीची भागीदारी‘ओडिशात भाजप आणि बिजू जनता दलाची (बीजेडी) ‘भागीदारी’ आहे आणि काँग्रेस राज्यातील लोकांचे हित जपण्यासाठी त्यांना विरोध करीत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले, ‘तुम्हाला माहीत आहे की नवीन पटनायक ओडिशात भागीदारीचे सरकार चालवतात.ते दोघेही हातमिळवणी करून काम करतात. मला संसदेत आढळले की बीजेडी भाजपला समर्थन देते. बीजेडीचे लोकही आम्हाला भाजपच्या सांगण्यावरून त्रास देतात. केवळ काँग्रेस पक्षच ओडिशातील लोकांसाठी बीजेडी-भाजप युतीला विरोध करीत आहे.’

३० लाख लोकांचे उपजीविकेसाठी स्थलांतर‘राज्यातील सुमारे ३० लाख लोक उपजीविकेसाठी इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, तर ३० कोट्यधीश राज्यांची संपत्ती लुटण्यासाठी येथे ओडिशाच्या बाहेरून आले आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLabourकामगारWomenमहिला