शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

''मी नोटाबंदीला मान्यता दिलीच नसती''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:15 IST

'मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती'

ठळक मुद्देमी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केलंनोटाबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत पण त्यावेळी जर मी रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती जोपर्यंत कोणतंही मोठं संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटाबंदीला मान्यता दिली नसती

मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या घोषणेनंतर देशातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, आता नोटाबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत पण त्यावेळी जर मी रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती असं जालान म्हणाले. ‘भारत: भविष्य की प्राथमिकता’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.यावेळी बोलताना, काळ्या पैशांच्या समस्येचा निपटारा करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं, पण त्यासाठी समस्येच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. करांचे दर अधिक तर नाहीत ना, हे पाहायाला पाहिजे असं ते म्हणाले. भारत सरकार रुपयाची हमी देतं. पण जोपर्यंत कोणतंही मोठं संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटाबंदीला मान्यता दिली नसती असं ते म्हणाले.  ‘नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी असं कोणतंही संकट ओढवलं नव्हतं’, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीचे नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही परिणाम पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले. नोटाबंदीमुळं चलन तुटवडा भासला आणि त्याचे वाईट परिणाम झाले, असं ते म्हणाले. यासोबतच बचत, गुंतवणूक आणि आयकर परताव्यात वाढ झाल्यानं या निर्णयाचा सकारात्मक परिणामही झाला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी जीएसटीबाबतही मत व्यक्त केलं. जीएसटी हे सरकारनं उचललेलं मोठं पाऊल असून जीएसटीचे दर दरवर्षी बदलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. बिमल जालान हे 1997 ते 2004 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी होते.