शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काेराेनाने पुन्हा चिंता, ४ महिन्यांनंतर एकाच दिवसात हजार रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 07:49 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे १,०७१ रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५,३०,८०२ झाली आहे

नवी दिल्ली : देशात १२९ दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवसात कोरोनाचे १,००० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. काही महिन्यांमध्ये रुग्णसंख्या घटल्यानंतर आता पुन्हा या विषाणूने डोके वर काढल्यामुळे चिंता वाढविली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५,९१५ झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे १,०७१ रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५,३०,८०२ झाली आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या ४.४६ कोटींवर पोहोचली आहे. 

काेराेनाचा नवा सब व्हेरिएंट एक्सबीबी १.१६ हा या रुग्णवाढीमागे कारणीभूत असू शकताे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे आकडेवारी सांगते. हा व्हेरिएंट राेगप्रतिकारक शक्तीला चुकवू शकताे. 

ही खबरदारी घ्या...  - खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. - खोकताना व शिंकताना हातरुमाल किंवा कपड्याने तोंड झाकून घ्या. आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुऊन काढा. - रुग्णांनी पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. धूम्रपान टाळावे. - लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात घ्याव्यात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या