शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अनुदानाशिवाय विश्व साहित्य संमेलन (१)

By admin | Updated: July 31, 2015 23:02 IST

- माधवी वैद्य : स्वा. सावरकरांच्या ५० व्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन

- माधवी वैद्य : स्वा. सावरकरांच्या ५० व्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन
नागपूर : स्वा. सावरकर अंदमानच्या कारागृहात होते. येथील सेल्युलर जेलमध्ये त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते ती खोली आहे. सावरकरप्रेमींसाठी ही खोली प्रेरणादायी आहे. सावरकरांप्रमाणेच अनेक देशभक्त क्रांतिकारक या कारागृहात होते. यंदा स्वा. सावरकरांची ५० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने अंदमान येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाला येण्यासाठी अनेक साहित्यप्रेमींनी इच्छा व्यक्त केली आहे. हे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन प्रथमच शासनाच्या अनुदानाशिवाय आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची माहिती देताना त्या बोलत होत्या. या संमेलनाचे आयोजक पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आहे तर संयोजन ऑफबिट डेस्टीनेशनचे नितीन शास्त्री यांचे आहे. हे संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना समर्पित करण्यात आले आहे. संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आहे. ९ ऑगस्ट रोजी महामंडळाच्या बैठकीत संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांची निश्चिती करण्यात येणार आहे. मुळात हे संमेलन जोहान्सबर्ग येथे आयोजित होणार होते. पण या संमेलनासाठी शासनाचे अनुदान काही अपरिहार्यतेने रखडले. या अनुदानाशिवाय जोहान्सबर्गला संमेलन घेणे शक्य नव्हते त्यामुळे अंदमानचा विचार करण्यात आला आणि सावरकरांची ५० वी पुण्यतिथी हे औचित्यही ठरले, असे माधवी वैद्य म्हणाल्या. या संमेलनासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली असून संमेलनाला जाण्यास इच्छुक रसिकांनी नितीन शास्त्री यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-----------
अद्याप साहित्य संमेलनाचा निर्णय नाही.
साहित्य संमेलनासाठी तब्बल १२ आमंत्रणे आहेत. त्यात बारामतीची चर्चा लोक करीत आहेत, हे माझ्याही कानावर आले पण महामंडळाने काहीही ठरविलेले नाही. डोंबिवली, पिंपरी चिंचवडचे दोन, सातारा, नांदेड, गोंदिया, बारामती, नृसिंहवाडी, उस्मानाबाद, गुलबर्गा आदी ठिकाणांची निमंत्रणे आहेत. अ. भा. संमेलन कुठे घेणार याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. कार्यकारिणीच्या बैठकीतच यावर निर्णय होई. तूर्तास विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाकडेच महामंडळाचे लक्ष आहे, असे त्या म्हणाल्या.