शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कुटुंबांमध्ये वाढला तणाव, IIT मधील तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 05:56 IST

कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे.

नवी दिल्ली :

कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे. उद्योगांना ही पद्धत सोयीची वाटते; परंतु यामुळे कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम झाल्याचे दिसत असून त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अमृतसर येथील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे दाखवून दिले आहे. हा अभ्यास ‘एम्प्लॉई रिलेशन्स’ या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यावर उपाय काय? कर्मचाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी ‘कर्मचारी समस्या - केंद्रित धोरण’ गरजेचे आहे. त्यानुसार नियोजन करून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मित्रांपर्यंत सक्रियपणे पोहोचणे गरजेचे आहे.

कोणता अभ्यास केला?- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यालय आणि कुटुंब यातील सीमामर्यादांचे उल्लंघन झाले आहे का? - ही संकल्पना फलदायी किंवा अपयशी ठरण्यात स्त्री-पुरुष भेद भूमिका बजावतो का? - ही पद्धत मोठ्या नोकरदारांनी कोरोनानंतरही चालू ठेवल्यामुळे अनेक कर्मचारी नाखूश आहेत.- यामुळे विवाहितांमध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. त्यांच्या नात्यात नवीन गुंतागुंत निर्माण झाली.संशोधनात नेमके काय?- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम. कार्यालयीन कामांनाही फटका बसला आहे.- कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक अपयशी पालक, अयशस्वी व्यावसायिक आहोत, अशी भावना बळावू लागली आहे. - भारतात पारंपरिक स्त्री-पुरुष भेदामुळे कुटुंबांमध्येही आणखी तणाव निर्माण झाला आहे.