शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेळगाव बॅरेज,निम्न तापीचे काम गुंडाळले अत्यल्प तरतुदीचा फटका: महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे रेंगाळणार

By admin | Updated: April 21, 2016 23:35 IST

जळगाव : जिल्‘ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

जळगाव : जिल्‘ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तापी नदीवरील हतनूर धरण ११ वेळेस भरेल एवढे पाणी या नदीच्या पात्रातून दरवर्षी वाहून जात असते. या पाण्याचा जळगाव जिल्‘ातील जनतेला लाभ व्हावा म्हणून तापी नदीवर जळगाव तालुक्यात तापी नदीवर शेळगाव बॅरेज बांधला जात आहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम भौतिकदृष्या ६२ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ११६.३६६ द.ल.घ.मी. (४.११ टीएमसी) असून त्यात यावल तालुक्यातील सर्वाधिक ९१२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची १९९७-९८ मधील प्रशासकीय मान्यतेची किंमत १९८.०५ कोटी होती. मात्र प्रकल्प लांबत गेल्याने आता प्रस्तावित सुधारित किंमत ६९९.४८ कोटी झाली आहे. केवळ उदासिनतेमुळे व पाठपुरावा होऊ न शकल्याने जवळपास ४०० कोटींपेक्षा अधिक फटका यामुळे बसणार आहे.
विविध मान्यता प्राप्त
विशेष म्हणजे या प्रकल्पात वन जमीन येत असताना त्यास मुख्य वनसंरक्षक भोपाळ यांच्याकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. पर्यावरण मंत्रालयानेही २०१० मध्ये अंतिम मान्यता देऊ केली आहे. २०१० याच वर्षी केंद्रीय जलआयोगाकडूनही मान्यता मिळालेली आहे. प्रकल्पाचे काम लांबत असल्याने केंद्रीय जलआयोगाकडे सुधारित १०६८.०७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
असा होणार फायदा
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्याच्या पाण्यावर जळगाव, यावल व भुसावळ तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. भुसावळ पालिकेचेही या प्रकल्पाच्या पाण्यावर आरक्षण आहे तसेच जळगाव औद्योगिक वसाहत व घरगुती वापर, जळगाव तालुक्यातील भादली व आठ गावे, ममुराबाद ५ गावांचेही आरक्षण या पाण्यावर आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांनाही यावर पाणी देणे अपेक्षित आहे.
निधी अभावी थांबले काम
हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ३०० कोटींच्या निधींची गरज आहे. प्रकल्पाचा प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनाच्या मान्यतेसाठी सादर असून त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. गेल्या वर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी १० कोटींची तरतूद झाली होती मात्र यावर्षी केवळ १ कोटींची तरतूद झाल्याने हे काम बंद पडले आहे.