शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शेळगाव बॅरेज,निम्न तापीचे काम गुंडाळले अत्यल्प तरतुदीचा फटका: महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे रेंगाळणार

By admin | Updated: April 21, 2016 23:35 IST

जळगाव : जिल्‘ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

जळगाव : जिल्‘ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तापी नदीवरील हतनूर धरण ११ वेळेस भरेल एवढे पाणी या नदीच्या पात्रातून दरवर्षी वाहून जात असते. या पाण्याचा जळगाव जिल्‘ातील जनतेला लाभ व्हावा म्हणून तापी नदीवर जळगाव तालुक्यात तापी नदीवर शेळगाव बॅरेज बांधला जात आहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम भौतिकदृष्या ६२ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ११६.३६६ द.ल.घ.मी. (४.११ टीएमसी) असून त्यात यावल तालुक्यातील सर्वाधिक ९१२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची १९९७-९८ मधील प्रशासकीय मान्यतेची किंमत १९८.०५ कोटी होती. मात्र प्रकल्प लांबत गेल्याने आता प्रस्तावित सुधारित किंमत ६९९.४८ कोटी झाली आहे. केवळ उदासिनतेमुळे व पाठपुरावा होऊ न शकल्याने जवळपास ४०० कोटींपेक्षा अधिक फटका यामुळे बसणार आहे.
विविध मान्यता प्राप्त
विशेष म्हणजे या प्रकल्पात वन जमीन येत असताना त्यास मुख्य वनसंरक्षक भोपाळ यांच्याकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. पर्यावरण मंत्रालयानेही २०१० मध्ये अंतिम मान्यता देऊ केली आहे. २०१० याच वर्षी केंद्रीय जलआयोगाकडूनही मान्यता मिळालेली आहे. प्रकल्पाचे काम लांबत असल्याने केंद्रीय जलआयोगाकडे सुधारित १०६८.०७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
असा होणार फायदा
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्याच्या पाण्यावर जळगाव, यावल व भुसावळ तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. भुसावळ पालिकेचेही या प्रकल्पाच्या पाण्यावर आरक्षण आहे तसेच जळगाव औद्योगिक वसाहत व घरगुती वापर, जळगाव तालुक्यातील भादली व आठ गावे, ममुराबाद ५ गावांचेही आरक्षण या पाण्यावर आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांनाही यावर पाणी देणे अपेक्षित आहे.
निधी अभावी थांबले काम
हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ३०० कोटींच्या निधींची गरज आहे. प्रकल्पाचा प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनाच्या मान्यतेसाठी सादर असून त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. गेल्या वर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी १० कोटींची तरतूद झाली होती मात्र यावर्षी केवळ १ कोटींची तरतूद झाल्याने हे काम बंद पडले आहे.