शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१ ऑक्टोबरपासून आठवड्यात ४ दिवस काम? मोदी सरकार लागू करू शकते नवी वेतन संहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 05:50 IST

हा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांस एका दिवसात ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : येत्या १ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारकडून नवी वेतन संहिता लागू केली जाण्याची शक्यता असून, असे झाल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ४ दिवस काम आणि ३ दिवस सुटी, असा पर्याय मिळू शकतो. हा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांस एका दिवसात ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल.

नव्या वेतन संहितेत कामाचे कमाल तास १२ करण्याचा प्रस्ताव असला तरी विविध कामगार संघटनांनी त्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे संहितेच्या अंमलबजावणीबाबत काही प्रमाणात अनिश्चितता आहे. सध्याच्या नियमानुसार, ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ केलेल्या अतिरिक्त कामाचा ओव्हरटाईम दिला जात नाही. नव्या संहितेत १५ मिनिटांपेक्षा जास्त कामाला ३० मिनिटे गृहीत धरून ओव्हरटाईम देण्याची तरतूद आहे. तसेच सलग ५ तासांपेक्षा जास्त काम करून घेण्यासही मनाई आहे. ५ तासांनंतर कर्मचाऱ्यास अर्धा तासाचा ब्रेक द्यावा लागेल.

सुत्रांनी सांगितले की, ४ दिवसांच्या कामाचा पर्याय कंपनी आणि कर्मचारी यांना सहमतीने निवडावा लागेल. सप्ताहातील कमाल कामास ४८ तासांची मर्यादा असेल. नवी वेतन संहिता सरकारला १ एप्रिल २०२१ पासूनच लागू करायची होती. तथापि, राज्य सरकारांनी विरोध केल्यामुळे तिची अंमलबजावणी लांबणीवर पडली. आता १ ऑक्टोबरपासून तिची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

या नवीन संहितेमुळे देशातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. या सोबत कामगार मंत्रालय देशात विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या असंघटित कामगारांची नोंदणी तसेच त्यांच्या  कल्याणासाठी नवीन पोर्टल विकसित करणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना यातून विविध सुविधा पुरवण्यात येणार आहे.

हातात येणारे वेतन घटणार 

- नव्या वेतन संहितेत भत्त्यांना वेतनाच्या ५० टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन वाढून पीएफमधील कपात वाढेल. 

- त्याबरोबरच कर्मचाऱ्यांना प्राप्तिकरही अधिक द्यावा लागेल. याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्याच्या हातात पडणारा पगार कमी होईल. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार