शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

Gandhi Jayanti 2020 : महिलांनो, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! अहिंसावादी बापूंचा संदेश

By हेमंत बावकर | Updated: October 2, 2020 13:04 IST

Mahatma Gandhi message for women's: महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता.

मोहनदास करमचंद गांधी....यांना अवघे जग महात्मा गांधी या नावाने ओळखते. आजच्या जगात गुन्हेगारी एवढी वाढली आहे की, बापूंचे विचार समजून त्याचे आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. यावर आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू काय सांगतात माहित आहे? एका पत्रात महात्मा गांधी यांनी हा सल्ला दिला आहे. 

महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते. 

'द माइंड ऑफ महात्‍मा गांधी' पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. रावणाने सीतेचे मन अनेक प्रलोभने देऊन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर आग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

महिलेच्या प्रश्नांना गांधींचे खुले उत्तरएका महिलेने बापुजींना तीन प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. गांधींनी 1942 मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ''ज्या महिलेवर बल्ताकाराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी म्हणाले होते. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRapeबलात्कारWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेश