शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे; गुजरातमधल्या काँग्रेसच्या महिला आमदाराचा उद्वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 15:53 IST

गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे.

अहमदाबाद- गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकमेकांवर चिखलफेक केली आहे. आता गुजरातमधल्या काँग्रेसच्या आमदार गेनिबेन ठाकोर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्कार करणा-या आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा जिवंत जाळलं पाहिजे.या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता ठाकोर यांनी या विधानावर सारवासारवीची भूमिका घेतली आहे. महिलांना शांत करण्यासाठी मी असं विधान केलं होतं, असंही त्या महिला आमदार म्हणाल्या आहेत. ठाकोर या बनासकांठा जिल्ह्यातील वाव भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्या वादग्रस्त विधान करत असल्याचा व्हिडीओ मोबाईलवरून बनवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्या महिलांच्या मध्ये उभ्या असून असं विधान करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओत ठाकोर म्हणतायत, भारतात प्रत्येकालाच कायद्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 50-150 लोकांना एकत्र यायला हवं. बलात्कार करणा-या त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन न करता जिवंत जाळलं पाहिजे.या विधानांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. 28 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आरोपींना त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली आहे. तो बिहारचा नागरिक आहे. व्हिडीओ माझ्या घरामध्ये तयार करण्यात आला आहे. हे कोणतंही सार्वजनिक रॅली किंवा संमेलन नव्हतं. मी जवळपास 100 महिलांना शांत करण्यासाठी असं विधान केलं होतं. त्याशिवाय माझा कोणताही उद्देश नव्हता. काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.