शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

घरात घुसून महिलेला मारहाण तुर्भेतील तरुणाचे कृत्य : पोलिसांनी तक्रार न घेताच महिलेला पाठवले घरी

By admin | Published: August 02, 2015 10:55 PM

नवी मुंबई : मारहाण करणार्‍या तरुणाविरोधात तक्रार करायला गेलेल्या महिलेची तक्रार न घेताच तिला परत पाठवल्याचा प्रकार तुर्भे गाव येथील महिलेसोबत घडला. ही महिला घरात एकटीच असताना त्याच परिसरातील तरुणाने घरात घुसून तिला मारहाण केली होती. याची तक्रार करण्यासाठी महिला एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली असता त्या तरुणाला समजावतो असे सांगून पोलिसांनी पीडित महिलेलाच तिथून पिटाळून लावले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे भयभीत झालेल्या या कुटुंबाने शहर सोडण्याची तयारी केली आहे.

नवी मुंबई : मारहाण करणार्‍या तरुणाविरोधात तक्रार करायला गेलेल्या महिलेची तक्रार न घेताच तिला परत पाठवल्याचा प्रकार तुर्भे गाव येथील महिलेसोबत घडला. ही महिला घरात एकटीच असताना त्याच परिसरातील तरुणाने घरात घुसून तिला मारहाण केली होती. याची तक्रार करण्यासाठी महिला एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली असता त्या तरुणाला समजावतो असे सांगून पोलिसांनी पीडित महिलेलाच तिथून पिटाळून लावले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे भयभीत झालेल्या या कुटुंबाने शहर सोडण्याची तयारी केली आहे.
तुर्भे गावात पती व दोन मुलांसह राहणार्‍या २५ वर्षीय महिलेला शनिवारी सकाळी तिच्याच घरात मारहाण झाली. पती मार्केटमध्ये कामाला गेल्यानंतर सकाळी ६ च्या सुमारास ही महिला मुलांसह घरात एकटीच होती. यावेळी परिचयाच्याच तरुणाने घरात घुसून तिला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. काही महिन्यांपूर्वी तुर्भे कॉलनीत हा तरुण त्यांच्या शेजारीच राहायला होता. त्यावेळीही या माथेफिरू तरुणाने तिला त्रास दिल्याने त्यांनी घर बदलले होते. अखेर शनिवारी सकाळी पुन्हा त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. रात्री पती घरी आल्यानंतर महिलेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. परंतु हा तरुण एका माथाडी नेत्याच्या कार्यालयात कामाला असल्याने त्याच्यावर कारवाई होईल की नाही अशी त्यांना शंका होती. त्यानंतरही धाडस करून रात्री ११.३०च्या सुमारास आपल्या भावासह ही महिला एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी तिच्याकडून तरुणाची संपूर्ण माहिती घेतली, मात्र तक्रार दाखल न करताच महिलेला घरी पाठवले. त्या मुलाला आम्ही समजावतो, तुम्ही निश्चिंत राहा असे मोघम आश्वासन यावेळी पोलिसांकडून मिळाल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अखेर तरुणाकडून सततच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी शहर सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.(प्रतिनिधी)