शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

तीन दिवस पोटात अन्नाचा कण नाही; महिलेनं अन्न अन्न करत सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 20:27 IST

गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे.

झारखंड- गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे. काल या महिलेचा अन्नावाचून जीव गेला. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचं नाव सावित्री देवी आहे. सावित्री देवी या गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्ड मिळवण्यासाठी रेशनिंग ऑफिसमध्ये फे-या मारत होत्या. परंतु मुजोर अधिका-यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या सावित्री देवींना रेशनिंगच्या धान्याचाच आधार होता. त्यासाठी त्यांनी तीन दिवस रेशनिंग ऑफिसचा फेरफटका मारला, पण तरीही त्यांना धान्य काही उपलब्ध झाले नाही. तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यानं सावित्री देवींना अखेर अन्न अन्न करत जीव सोडावा लागला. या सर्व प्रकाराला रेशनिंग ऑफिसर जबाबदार असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी शीतल प्रसाद यांनी केला आहे.  दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.सासूच्या मृत्यूबाबत सून सरस्वती देवींनी दुःख व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, सावित्री देवी गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्डच्या मागणीसाठी रेशनिंग ऑफिसच्या फेरफटका मारत होत्या. परंतु त्याकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केलं. सावित्री देवींना गेल्या तीन दिवसांपासून अन्न मिळालं नाही. दोन्ही मुलं अंगमेहनत करून रोजी-रोटी मिळवतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुलं त्यांच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे परिस्थिती बिघडली. सावित्री देवी या भीक मागून अन्न खात असल्याचंही सून सरस्वती देवीनं सांगितलं आहे.या घटनेची डुमरीचे आमदार जगरनाथ महतो यांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच सावित्री देवींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनीही केला. विधानसभेत यासंदर्भात आम्ही आवाज उठवू, असंही ते म्हणाले आहेत. झारखंडमध्ये भूकबळीची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीसुद्धा राज्यातील सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला होता. त्याच्या काही काळानंतर 43 वर्षीय रिक्षा चालकाचाही अन्नावाचून मृत्यू झाला होता. सिमडेगामध्ये रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांना धान्य मिळालं नव्हतं. त्यामुळे 28 सप्टेंबर 2017रोजी एका चिमुकलीचाही मृत्यू झाला होता.