शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुन्हा जिवंत करतो सांगून तांत्रिकांनी 45 दिवस बंद खोलीत ठेवला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 17:19 IST

एका आजारी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच तांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक झाली असून मुख्य आरोपी गजेंद्र सिंह अजूनही फरार आहे.

ठळक मुद्देअनिताला सैतानी शक्तीने झपाटले असून आपणच तिला बरे करु शकतो असा दावा या मांत्रिकांनी केला.अनिताला तिच्या खोलीमध्ये बंद केल्यानंतर ती स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल असे खोटे आश्वासनही त्यांनी दिले.

जयपूर - एका आजारी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच तांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक झाली असून मुख्य आरोपी गजेंद्र सिंह अजूनही फरार आहे. या पाच तांत्रिकांनी आजारी महिलेला डॉक्टरकडे नेण्यापासून तिच्या नातेवाईकांना रोखले. आपण तंत्र-मंत्रांच्या आधारे महिलेला रोग मुक्त करु, तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आपण  तिला पुन्हा जिवंत करु असे कुटुंबियांना सांगत तिचा मृतदेह 45 दिवस खोलीत बंद करुन ठेवला. 

राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरात ही घटना घडली. अनिता असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या भावाने शामने या प्रकरणी एफआयआर दाखल केला. जानेवारी महिन्यात अनिता आजारी पडली. तिचे आई-वडिल तिला मांत्रिकांकडे घेऊन गेले. अनिताला सैतानी शक्तीने झपाटले असून आपणच तिला बरे करु शकतो असा दावा या मांत्रिकांनी केला. त्यांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यापासूनही रोखले. 

14 जानेवारीला अनिता बेशुद्ध पडली. त्यावेळी तांत्रिकांनी तिला तिच्या घराच्या रुममध्ये बंद केले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अनिताला तिच्या खोलीमध्ये बंद केल्यानंतर ती स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल असे खोटे आश्वासनही त्यांनी दिले. मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरु नये यासाठी ते खोलीमध्ये, मृतदेहावर अत्तराची फवारणी करायचे. या दरम्यान त्यांनी अनिताच्या दोन बहिणी आणि तिच्या आई-वडिलांना घराबाहेर पडू दिले नाही. 

27 फेब्रुवारीला अनिताला ज्या खोलीत बंद करुन ठेवले होते तिथून दुर्गंधी येऊ लागली. त्यावेळी अनिताची बहिण मोहिनी कशीबशी घरातून बाहेर पडली व तिने जवळच राहणाऱ्या भावाचे शामचे घर गाठले व सर्व  प्रकार सांगितला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उजेडात आला.