शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा

By admin | Updated: February 26, 2015 14:19 IST

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ न करता रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - देशभराचे लक्ष लागलेले रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केले. सुरेश प्रभूंच्या भाषणाला सुरुवात झाली असून सुरेश प्रभू महाराष्ट्रावर काय कृपादृष्टी दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केले. सध्या प्रभू यांचे बजेट वाचन सुरु असून यंदा प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.   कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा नाही, सर्वेक्षण करुनच नवीन गाड्यांची घोषणा करणार असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

रेल्वे अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे 

- स्वयंरोजगार आणि मनुष्यबळ विकासावर भर देणार, कोकण रेल्वेवर गेल्या तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे 

- रेल्वे गाड्यांना व स्टेशनला कंपन्यांची नावे देऊन पैसे कमवणार

- यावर्षाअखेरपर्यंत देशाच्या किनारपट्टीवरील भागांना रेल्वेशी जोडण्यासाठी कोस्टल कनेक्टिव्हीटी प्रॉग्रेम सुरु करणार
- कामगिरीवर आधारित बोनस देण्याची पद्धत देणार, आरपीएफसाठी विद्यापीठ स्थापन करणार
- रेल्वेत सौर उर्जेचा वापर करणार
- रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप राबवणार
- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत नवीन रेल्वे मार्ग बांधण्यासाठी संयुक्त योजना राबवणार 
- कायाकल्प योजनेद्वारे भारतीय रेल्वेतील तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करणार
- देशातल्या ४ विद्यापीठांमध्ये रेल्वेचे संशोधन केंद्र
- ट्रेनची टक्कर टाळण्यासाठीही अलार्म सिस्टम
- वाराणसीमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे संशोधन केंद्र स्थापन करणार
- रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी जूनपर्यंत अॅक्शन प्लॅन मांडणार, मानव विरहित फाटकांवर अलार्म बसवणार
- १०८ गाड्यांमध्ये ई कॅटरिंगची सुविधा देणार 
- मुंबई - दिल्लीसोबतच अन्य नऊ मार्गांवर हायस्पीड ट्रेन धावणार
- प्रवाशांच्या सुरक्षा विषयक तक्रारींसाठी १८२ ही टॉल फ्री हेल्पलाईन सुरु करणार 
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार
- ४०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार
- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य  
- रेल्वे आणि स्टेशनवरील स्वच्छतेसाठी नवीन स्वच्छता विभाग
- मोठ्या शहरांमधील १० रेल्वे स्थानकांवर सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल करणार
- प्रवाशांना दोन महिन्यांऐवजी ४ महिन्यांअगोदरच आरक्षण करता येणार
- यावर्षी १७ हजार स्वच्छता गृहांचे बायो टॉयलेटमध्ये पुनर्विकास करणार
- ऑपरेशन ५ मिनीट राबवणार, यामुळे अनारक्षित तिकीटावर प्रवास करणा-या प्रवाशांना पाच मिनीटांत तिकीट देण्याचे लक्ष्य
- खासदारांनी त्यांच्या निधीचा जास्तीत जास्त वापर रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करावे
- सर्वसामान्यांसाठी ठराविक गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या वाढवणार
- रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार
- प्रवाशांना गाड्यांचे आगमन व डिपार्चरच्या वेळेसंबंधीची एसएमसद्वारे देणार
- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही लांब पल्ल्यांच्या गाड्या व उपनगरीय गाड्यांच्या महिल्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
- विमानाप्रमाणेच रेल्वेतही व्हॅक्यूम टॉयलेट तयार करणार
- निर्भया फंडमधील निधीचा वापर रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी करणार
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार 
- प्रवाशांना गाड्यांचे आगमन व डिपार्चरच्या वेळेसंबंधीची एसएमसद्वारे देणार
- रेल्वेत पार्टनरशिपची गरज, राज्य सरकारांसमवेत मिळून काम करण्याची गरज
- सुरक्षित आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आमचे लक्ष्य
- २० हजार सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे
- काही तरी नवीन जोडावे लागेल, जुने तोडावे लागेल, सामर्थ्य दाखवावे लागेल
- आगामी पाच वर्षांत रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, यामध्ये कमी खर्च, यामध्ये भूसंपादनाची समस्या नाही, वेग वाढवल्यास वेळेतही बचत
- रेल्वे मंत्रालयावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे, त्यांना चांगल्या सेवेची अपेक्षा
- गेल्या काही वर्षांत रेल्वेकडे दुर्लक्ष झाले