शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

By admin | Updated: May 27, 2017 15:58 IST

बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.27-   बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला भारतीये सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याने जम्मू-काश्मीर सरकारने पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून तेथे इंटरनेट सेवा बंद होती. एकुण 22 सोशल नेटवर्किंग साइट तेथे एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 
 
इंटरनेट सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. तसंच कधीपर्यत इंटरनेट बंद असेल, या बद्दलचीसुद्धा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, "दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद मारला गेला. ही चकमक सुरु असताना दगड फेक करणारे व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवून अहमदच्या मदतीसाठी बाहेर येण्याचं आवाहन लोकांना करत होते. ही गोष्ट धोकादायक आहे अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती. 
 
दगडफेक करणारे व्हॉट्यअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना एकत्रित होऊन रस्त्यावर येण्याचं आवाहन करत होते. सुरक्षा दलाकडून अहमद मारला गेला, या मेसेजमुळे काश्मिर खोऱ्यातील बरेच लोक रस्त्यावरही उतरले होते, अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोबाईल इंटरनेटवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी जेव्हा बुरहान वानी मारला गेला होता तेव्हा सरकारकडून 12 तास कोणत्याही प्रकारची पाऊलं उचलली गेली नव्हती, ज्यामुळे जम्मू-काश्मिर खोऱ्यात मोठा हिंसाचार झाला होता. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळया चकमकींमध्ये आठ दहशतवादी ठार झाले आहेत. तसंच  त्रालमध्ये इमारतीत लपून बसलेले तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केलं आहे.