शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

By admin | Updated: May 27, 2017 15:58 IST

बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.27-   बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला भारतीये सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याने जम्मू-काश्मीर सरकारने पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून तेथे इंटरनेट सेवा बंद होती. एकुण 22 सोशल नेटवर्किंग साइट तेथे एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 
 
इंटरनेट सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. तसंच कधीपर्यत इंटरनेट बंद असेल, या बद्दलचीसुद्धा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, "दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद मारला गेला. ही चकमक सुरु असताना दगड फेक करणारे व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवून अहमदच्या मदतीसाठी बाहेर येण्याचं आवाहन लोकांना करत होते. ही गोष्ट धोकादायक आहे अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती. 
 
दगडफेक करणारे व्हॉट्यअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना एकत्रित होऊन रस्त्यावर येण्याचं आवाहन करत होते. सुरक्षा दलाकडून अहमद मारला गेला, या मेसेजमुळे काश्मिर खोऱ्यातील बरेच लोक रस्त्यावरही उतरले होते, अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोबाईल इंटरनेटवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी जेव्हा बुरहान वानी मारला गेला होता तेव्हा सरकारकडून 12 तास कोणत्याही प्रकारची पाऊलं उचलली गेली नव्हती, ज्यामुळे जम्मू-काश्मिर खोऱ्यात मोठा हिंसाचार झाला होता. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळया चकमकींमध्ये आठ दहशतवादी ठार झाले आहेत. तसंच  त्रालमध्ये इमारतीत लपून बसलेले तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केलं आहे.