शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

By admin | Updated: May 27, 2017 15:58 IST

बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.27-   बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला भारतीये सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याने जम्मू-काश्मीर सरकारने पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून तेथे इंटरनेट सेवा बंद होती. एकुण 22 सोशल नेटवर्किंग साइट तेथे एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 
 
इंटरनेट सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. तसंच कधीपर्यत इंटरनेट बंद असेल, या बद्दलचीसुद्धा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, "दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद मारला गेला. ही चकमक सुरु असताना दगड फेक करणारे व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवून अहमदच्या मदतीसाठी बाहेर येण्याचं आवाहन लोकांना करत होते. ही गोष्ट धोकादायक आहे अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती. 
 
दगडफेक करणारे व्हॉट्यअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना एकत्रित होऊन रस्त्यावर येण्याचं आवाहन करत होते. सुरक्षा दलाकडून अहमद मारला गेला, या मेसेजमुळे काश्मिर खोऱ्यातील बरेच लोक रस्त्यावरही उतरले होते, अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोबाईल इंटरनेटवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी जेव्हा बुरहान वानी मारला गेला होता तेव्हा सरकारकडून 12 तास कोणत्याही प्रकारची पाऊलं उचलली गेली नव्हती, ज्यामुळे जम्मू-काश्मिर खोऱ्यात मोठा हिंसाचार झाला होता. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळया चकमकींमध्ये आठ दहशतवादी ठार झाले आहेत. तसंच  त्रालमध्ये इमारतीत लपून बसलेले तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केलं आहे.