शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

संसदेचे हिवाळी अधिवेशन फलदायी ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:12 IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन विधायक चर्चा आणि नवीन सूचनांमुळे फलदायी ठरून देशाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. अधिवेशनात २५ प्रलंबित आणि १४ नवी विधेयके सादर होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन विधायक चर्चा आणि नवीन सूचनांमुळे फलदायी ठरून देशाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. अधिवेशनात २५ प्रलंबित आणि १४ नवी विधेयके सादर होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. यात तीन वेळा तलाक प्रकरणात मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार देणाºया विधेयकाचाही समावेश आहे.मोदी म्हणाले की, गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशाला पुढे नेण्याची गरज असून, संसदेचे हिवाळी अधिवेशन त्यासाठी सकारात्मकदृष्ट्या वापरले गेले पाहिजे, ही राजकीय नेत्यांची स्पष्ट भूमिका होती. देशाच्या विकासाला हे अधिवेशन हातभार लावील, अशी आशा मला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेले हे अधिवेशन पाच जानेवारीपर्यंत चालेल.लोकसभेचे कामकाज स्थगित- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज तीन विद्यमान व सात माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्थगित झाले.ते सोमवारी सुरू होईल. या सदस्यांचे निधन आंतर अधिवेशनादरम्यान झाले. सभागृह सुरू होताच गुरुदासपूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे सुनील कुमार जाखड यांनी पंजाबीतून शपथ घेतली.जाखड यांचे मोदी यांनी हस्तांदोलन करून अभिनंदन केले, तर जाखड यांनी त्यांना नमस्कार केला. नंतर मोदी यांनी नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली.त्यात धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन व पीयूष गोयल यांचा समावेश होता. तीन सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या फेररचनेत या तिघांना कॅबिनेटचा दर्जा दिला गेला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी