शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर; बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:15 IST

नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मतचाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेले १२९वे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. विरोधी पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला. या विधेयकावर सखोल विचार-विनिमयासाठी हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवले जाईल.

कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी '१२९वी घटनादुरुस्ती विधेयक-२०२४' तसेच याच्याशी संबंधित 'केंद्रशासित प्रदेश कायदादुरुस्ती विधेयक-२०२४' एकत्रित मांडले. या विधेयकांना विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला. विधेयकावर घेण्यात आलेल्या मतविभागणीनुसार विधेयकाच्या बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते पडली. केंद्रशासित प्रदेशासंबंधीचे विधेयक आवाजी मतदानाने सादर करण्यात आले. ही दोन्ही विधेयके मांडल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी ३पर्यंत तहकूब केले. भाजपचे २० खासदार अनुपस्थित होते.

नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली ही पहिलीच मतचाचणी होती. यावेळी विरोधी पक्षांनी सभागृहात तीव्र विरोध सुरू केला. यादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले, हे विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले गेले तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे पाऊल; विरोधी पक्षांची टीका 

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करताना आरोप केला की, हे विधेयक म्हणजे संविधानाच्या मूळ रचनेवरच हल्ला आहे. तसेच देशाला हुकूमशाहीकडे नेणारे हे पाऊल आहे, विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात यावे, अशी आग्रही मागणी या विरोधी पक्षांनी केली.

राज्यांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही; सरकारने केला दावा 

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यासंबंधीच्या या विधेयकामुळे राज्यांच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट हे विधेयक पूर्णपणे घटनात्मक असल्याचा दावा कायदा मंत्री मेघवाल यांनी केला. विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली.

विधेयक मंजुरीसाठी आवश्यक समर्थन

लोकसभा : लोकसभेच्या ५४२ सदस्यांपैकी विधेयक मंजुरीसाठी ३६१ सदस्यांच्या समर्थनाची गरज आहे. एनडीए व्यतिरिक्त सरकारला वायएसआरसीपी, बीजेडी आणि एआयएडीएमके यांचा पाठिंबा आवश्यक असेल.

राज्यसभा : राज्यसभेत २३१ सदस्यांपैकी १५४ सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे. सध्या एनडीएकडे ११४, इंडिया आघाडीकडे ८६ आणि अन्य पक्षांकडे २५ सदस्य आहेत.

अडचणी : संविधानातील अनेक कलमांमध्ये सुधारणा करावी लागेल. सर्व राज्ये आणि राजकीय पक्ष यामध्ये एकमत तयार करणे आव्हानात्मक ठरू शकते.

फायदे : खर्च आणि वेळ वाचतो. निवडणुकीतील आदर्श आचारसंहिता लागू होण्यामुळे विकासकामे थांबतात, ती समस्या टळेल.

विधेयकाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

- निवडणुका एकत्र : देशभरात लोकसभा आणि सर्व राज्य विधान- सभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद आहे. 

- प्रशासकीय व आर्थिक फायदे : एकत्र निवडणुकांमुळे निवडणूक प्रक्रियेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. प्रशासकीय साधन- सामग्री आणि सुरक्षा दलांचा वापर अधिक प्रभावी होईल. 

- मध्यावधी निवडणुका : जर काही कारणाने एखादे राज्य सरकार बरखास्त झाले किंवा लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला, तर निवडणुका फक्त उरलेल्या कालावधीसाठीच घेतल्या जातील. 

- विकासकामे : वारंवार निवडणुका घेतल्याने विकासका- मांवर होणारा अडथळा दूर होईल. निवडणुकीतून सुटका मिळाल्यावर सरकारांना सतत कामकाजावर लक्ष केंद्रित करता येईल.

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनParliamentसंसदlok sabhaलोकसभा