शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीसोबत येणार? जगन मोहन रेड्डींना पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव, संजय राऊत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:58 IST

वायएसआर काँग्रेसचे जनग मोहन रेड्डी काही दिवसातच इंडिया आघाडीमध्ये सामील होणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीसोबत जोणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनात हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही हजेरी लावली. यावेळी टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हंसडा, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम आणि एआयएडीएमके नेते थंबी दुराई हेही रेड्डी यांना पाठिंबा दिला. यादरम्यान, तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने जगन मोहन यांना इंडिया आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले.

खासदारांच्या संख्याबळाची आठवण करुन दिली

दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएकडे १५ खासदार असल्याची आठवण करून दिली. वायएसआरसीपीचे राज्यसभेत ११ खासदार आहेत, तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या १६ आहे. या पक्षाचे लोकसभेत ४ खासदार आहेत. आमची आणि टीडीपीची ताकद समान आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 

जंतरमंतरवर माध्यमांसोबत बोलताना जगन मोहन रेड्डी म्हणाले, 'आज ते राज्यात सत्तेत आहेत. कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. उद्या आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो. पण आम्ही अशा वर्तनाचे कधीच समर्थन केले नाही. आम्ही कधीही हल्ल्यांना आणि मालमत्तेचे नुकसान करण्यास प्रोत्साहन दिले नाही. मात्र टीडीपीचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशातील परिस्थिती आज पूर्णपणे वेगळी आहे.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशात लोकशाही आहे की नाही. राज्यात नवे सरकार आल्यानंतर ४५ दिवसांत ३० हून अधिक लोकांची हत्या झाली आहे. अनेक मालमत्तांचीही नासधूस झाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश राज्यभर लाल किताब प्रदर्शित करत आहे. या लाल किताबात त्या नेत्यांची नावे आहेत ज्यांच्यावर ते कारवाई आणि हल्ले करतील. असे होर्डिंग राज्यभर लावले जातात, असंही माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले. 

सत्तेत आल्यानंतर विरोधकांना अशा प्रकारे टार्गेट करू नये, असे अखिलेश यादव म्हणाले. विरोधकांचा आवाजही ऐकायला हवा. लोकशाहीत आलेला बुलडोझरचा ट्रेंड आम्हाला मान्य नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. धमक्या देणारे लोक सत्तेत जास्त काळ टिकत नाहीत.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी