शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीसोबत येणार? जगन मोहन रेड्डींना पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव, संजय राऊत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:58 IST

वायएसआर काँग्रेसचे जनग मोहन रेड्डी काही दिवसातच इंडिया आघाडीमध्ये सामील होणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीसोबत जोणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनात हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही हजेरी लावली. यावेळी टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हंसडा, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम आणि एआयएडीएमके नेते थंबी दुराई हेही रेड्डी यांना पाठिंबा दिला. यादरम्यान, तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने जगन मोहन यांना इंडिया आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले.

खासदारांच्या संख्याबळाची आठवण करुन दिली

दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएकडे १५ खासदार असल्याची आठवण करून दिली. वायएसआरसीपीचे राज्यसभेत ११ खासदार आहेत, तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या १६ आहे. या पक्षाचे लोकसभेत ४ खासदार आहेत. आमची आणि टीडीपीची ताकद समान आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 

जंतरमंतरवर माध्यमांसोबत बोलताना जगन मोहन रेड्डी म्हणाले, 'आज ते राज्यात सत्तेत आहेत. कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. उद्या आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो. पण आम्ही अशा वर्तनाचे कधीच समर्थन केले नाही. आम्ही कधीही हल्ल्यांना आणि मालमत्तेचे नुकसान करण्यास प्रोत्साहन दिले नाही. मात्र टीडीपीचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशातील परिस्थिती आज पूर्णपणे वेगळी आहे.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशात लोकशाही आहे की नाही. राज्यात नवे सरकार आल्यानंतर ४५ दिवसांत ३० हून अधिक लोकांची हत्या झाली आहे. अनेक मालमत्तांचीही नासधूस झाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश राज्यभर लाल किताब प्रदर्शित करत आहे. या लाल किताबात त्या नेत्यांची नावे आहेत ज्यांच्यावर ते कारवाई आणि हल्ले करतील. असे होर्डिंग राज्यभर लावले जातात, असंही माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले. 

सत्तेत आल्यानंतर विरोधकांना अशा प्रकारे टार्गेट करू नये, असे अखिलेश यादव म्हणाले. विरोधकांचा आवाजही ऐकायला हवा. लोकशाहीत आलेला बुलडोझरचा ट्रेंड आम्हाला मान्य नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. धमक्या देणारे लोक सत्तेत जास्त काळ टिकत नाहीत.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी