शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा निवडणूक आयोगाच्याच हातात सारा 'खेळ'; वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागणार? की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:23 IST

रिक्त जागेसाठी सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. मात्र, यासाठी देखील एक अट आहे. त्याहून मोठा पेच राहुल गांधींच्या प्रकरणात आहे...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरतच्या न्यायालयाने राहुल यांच्याविरोधात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यामुळे आता जिथून राहुल निवडून आले होते, त्या केरळमधील वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता सारे लक्ष निवडणूक आयोगाकडे लागले आहेत.

एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला किंवा अपात्र ठरला तर त्याच्या रिक्त जागेसाठी सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. मात्र, यासाठी देखील एक अट आहे. ती अट जर पूर्ण होत असेल तरच निवडणूक आयोगाला निवडणूक घेता येते. राहुल गांधींविरोधातील निर्णय २३ मार्चला आला होता. अयोग्यतेची कारवाई २४ मार्चला करण्यात आली. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यास अजून एक वर्षापेक्षा अधिकचा वेळ उरलेला आहे. 

अशावेळी लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 151A अन्वये, निवडणूक आयोगाला संसद आणि विधानसभेतील रिक्त जागांसाठी सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीला कमीतकमी एक वर्ष तरी मिळणे आवश्यक असते. यामुळे वायनाड मतदारसंघात 22 सप्टेंबर 2023 पर्यंत पोटनिवडणूक घेणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. 

उल्हास बापट काय म्हणाले...सचिवालयाचा हा निर्णय राज्यघटनेला धरूनच आहे. आता राहूल गांधी न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तरच त्यांचे संसद सदस्यत्व राहू शकते. मात्र हा निर्णय घटनेला धरून असला तरी त्यात कायदेशीर बाबींपेक्षाही राजकीय दबाव जास्त आहे, असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. 

जर राहुल गांधींचे सदस्यत्व कायम राहिले, तर निवडणूक आयोग वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेऊ शकणार नाही. यासाठी राहुल यांना उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. तिथे त्यांना वेळेवर दिलासा मिळाला तर त्यांची खासदारकी वाचणार आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोग पोटनिवडणूक लावतो का, की राहुल गांधींवरील वरच्या कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतो हे पहावे लागणार आहे. कारण जर यात दोन-तीन महिने निघून गेले तर एक वर्षाची अट लागू होईल आणि वायनाडमध्ये आयोगाला निवडणूक लावता येणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग