शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"पंतप्रधान राजीनामा देतील का?; चौथी पास राजाकडून काय अपेक्षा करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 05:52 IST

निवासस्थान नूतनीकरण चौकशीवरून वाद

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या चौकशीत काहीच आढळले नाही तर खोटी चौकशी केल्याच्या गुन्ह्याखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देतील काय? असे आव्हान काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.

सीबीआय चौकशी सुरु झाल्यामुळे आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. सीबीआय चौकशीतून त्यांची भीतीच दिसते आहे. आपल्याविरुद्ध चौकशी ही नवी गोष्ट नाही. शाळा, बस, मद्य, रस्ते, पाणी, वीज घोटाळ्यांच्या आरोपांसह जगात सर्वात जास्त चौकशी आपली झाली असेल. कोणत्याच प्रकरणात काहीही मिळाले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

एका चौथी पास राजाकडून आणखी अपेक्षाही काय करता येईल ते २४ तास चौकशीचे गेम खेळत असतात किंवा भाषणे देत असतात. आपल्याविरुद्ध ३३ पेक्षा जास्त प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. आता आणखी एका नव्या चौकशीची त्यात पडली. पण आपण झुकणार नाही. त्यांनी या प्रकरणाचीही चौकशी करुन घ्यावी, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. हा भाजप सरकारचा आम आदमी पार्टीला भयभीत करुन तोडण्याचा प्रयत्न  आहे, अशी आक्रमक भूमिका केजरीवाल यांनी घेतली.  

सुटका मुश्कील : तिवारीकेजरीवालचे सरकार हे गुन्हेगारांनी चालविलेले सरकार आहे. सीबीआय या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन सर्व सत्य बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केली. देशाच्या राजकीय इतिहासात जन्माला आल्यानंतर अल्पावधीत सर्वसामान्यांना खजिना लुटण्याचा पराक्रम ‘आप’ने केला आहे. या प्रकरणातून केजरीवाल यांची सुटका मुश्कील आहे.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल