शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द होणार? समान नागरी कायद्याने वादाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:36 IST

केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्यावरून गदारोळ होण्याची व संसदेचे आखाड्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी होत आहे. परंतु तत्पूर्वी सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द करण्याचे मोठे आव्हान आहे.

हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चनांचे विवाह कायदे, वारसा कायदे, मालमत्ता कायदे, कुटुंब कायदे, बहुविवाह प्रथा, दत्तक कायदा, बालके व वृद्धांशी संबंधित कायद्यांवर कायदेशीर वाद व पेच एवढा मोठा आहे की, त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्यात आला नाही तर देशभरात नवा वाद उभा राहू शकतो.

लिव-इन, समलैंगिकता यासारख्या विषयांचाही यात समावेश करण्यात आला आहे. विधी आयोगाने ३० दिवसांची नोटीस जारी करून धार्मिक संघटना, सामाजिक संघटनांकडून मते मागवली आहेत. ३० दिवसांनंतर विधी आयोग आपली शिफारस केंद्राला पाठवणार आहे. केंद्र सरकार विधी आयोगाच्या शिफारशी असलेले विधेयक मंत्रिमंडळात पारित करून संसदेत सादर करू शकते.

विधी तज्ज्ञांची टीम

विधी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली असून, समान नागरी कायद्याच्या प्रत्येक पैलूवर अभ्यास केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार राज्यांत कायदा लागू करून कायदेशीर, तांत्रिक उणिवा दूर करण्यात येतील.

आधी उत्तराखंडमध्ये लागू होणार

  • सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, गोव्यात समान नागरी कायदा आधीपासूनच लागू आहे. उत्तराखंडमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागू होऊ शकतो. 
  • गुजरात, आसाम व उत्तर प्रदेशातही कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात हा कायदा लागू करू इच्छित आहे. 
  • भाजपचे तीन प्रमुख मुद्दे 
  • कलम ३७०, राममंदिर व समान नागरी कायदा, यापैकी दोन मुद्द्यांची पूर्तता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झाली. आता फक्त एकच मुद्दा राहिला असून, त्यावर वेगाने काम सुरू आहे.
  • निवडणुकीचा अजेंडा निश्चित 
  • २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू होईल व अयोध्येत राममंदिरही सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले जाईल. म्हणजेच २०२४चा मोदी सरकारचा निवडणूक अजेंडा निश्चित झालेला आहे.

कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा रद्द

कर्नाटक सरकारने गुरुवारी मागील भाजपने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :Indiaभारत