शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द होणार? समान नागरी कायद्याने वादाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:36 IST

केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्यावरून गदारोळ होण्याची व संसदेचे आखाड्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी होत आहे. परंतु तत्पूर्वी सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द करण्याचे मोठे आव्हान आहे.

हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चनांचे विवाह कायदे, वारसा कायदे, मालमत्ता कायदे, कुटुंब कायदे, बहुविवाह प्रथा, दत्तक कायदा, बालके व वृद्धांशी संबंधित कायद्यांवर कायदेशीर वाद व पेच एवढा मोठा आहे की, त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्यात आला नाही तर देशभरात नवा वाद उभा राहू शकतो.

लिव-इन, समलैंगिकता यासारख्या विषयांचाही यात समावेश करण्यात आला आहे. विधी आयोगाने ३० दिवसांची नोटीस जारी करून धार्मिक संघटना, सामाजिक संघटनांकडून मते मागवली आहेत. ३० दिवसांनंतर विधी आयोग आपली शिफारस केंद्राला पाठवणार आहे. केंद्र सरकार विधी आयोगाच्या शिफारशी असलेले विधेयक मंत्रिमंडळात पारित करून संसदेत सादर करू शकते.

विधी तज्ज्ञांची टीम

विधी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली असून, समान नागरी कायद्याच्या प्रत्येक पैलूवर अभ्यास केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार राज्यांत कायदा लागू करून कायदेशीर, तांत्रिक उणिवा दूर करण्यात येतील.

आधी उत्तराखंडमध्ये लागू होणार

  • सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, गोव्यात समान नागरी कायदा आधीपासूनच लागू आहे. उत्तराखंडमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागू होऊ शकतो. 
  • गुजरात, आसाम व उत्तर प्रदेशातही कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात हा कायदा लागू करू इच्छित आहे. 
  • भाजपचे तीन प्रमुख मुद्दे 
  • कलम ३७०, राममंदिर व समान नागरी कायदा, यापैकी दोन मुद्द्यांची पूर्तता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झाली. आता फक्त एकच मुद्दा राहिला असून, त्यावर वेगाने काम सुरू आहे.
  • निवडणुकीचा अजेंडा निश्चित 
  • २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू होईल व अयोध्येत राममंदिरही सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले जाईल. म्हणजेच २०२४चा मोदी सरकारचा निवडणूक अजेंडा निश्चित झालेला आहे.

कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा रद्द

कर्नाटक सरकारने गुरुवारी मागील भाजपने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :Indiaभारत