शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

२०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, चंद्रयान प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:58 IST

चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

नागपूर : चंद्रयान-३ मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत अवकाशात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राे) ने २०३५ पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. यासाठी इस्राेने तयारी सुरू केली असल्याची माहिती चंद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी दिली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) गुरुवारी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान कार्यक्रम कार्यालयाचे संचालक डॉ. तीर्थ प्रतिम दास, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल उपस्थित होते. पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले की, २०२३ मधील इस्रोची चंद्रयान-३ मोहीम चंद्रावर मानव उतरण्याच्या मोहिमेत मोठे पाऊल ठरले. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

अंतराळवीर १५ दिवस चंद्रावर राहू शकणार?मानवी चंद्र मोहिमेसाठी प्राथमिक काम सुरू झाले आहे. भारताच्या ‘स्पेस स्टेशन प्रोग्राम’मध्ये अंतराळवीरांना १५ ते २० दिवस कक्षेत राहू देण्याची योजना आहे. सध्या ते संकल्पनात्मक टप्प्यात आहे, असे पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले.

अमेरिका चीनबरोबर भारतही मागे नाहीजगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. यात आता भारतही मागे राहिलेला नाही. अमेरिका, चीन या देशांनी २०३६ पर्यंत चंद्रावर आपला तळ ठोकण्याची तयारी चालविली आहे. भारतानेही अशा प्रकल्पाची घोषणा केली असून २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची ‘इस्रो’ची माेहीम आहे.

टॅग्स :isroइस्रो