शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

२०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, चंद्रयान प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:58 IST

चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

नागपूर : चंद्रयान-३ मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत अवकाशात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राे) ने २०३५ पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. यासाठी इस्राेने तयारी सुरू केली असल्याची माहिती चंद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी दिली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) गुरुवारी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान कार्यक्रम कार्यालयाचे संचालक डॉ. तीर्थ प्रतिम दास, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल उपस्थित होते. पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले की, २०२३ मधील इस्रोची चंद्रयान-३ मोहीम चंद्रावर मानव उतरण्याच्या मोहिमेत मोठे पाऊल ठरले. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

अंतराळवीर १५ दिवस चंद्रावर राहू शकणार?मानवी चंद्र मोहिमेसाठी प्राथमिक काम सुरू झाले आहे. भारताच्या ‘स्पेस स्टेशन प्रोग्राम’मध्ये अंतराळवीरांना १५ ते २० दिवस कक्षेत राहू देण्याची योजना आहे. सध्या ते संकल्पनात्मक टप्प्यात आहे, असे पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले.

अमेरिका चीनबरोबर भारतही मागे नाहीजगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. यात आता भारतही मागे राहिलेला नाही. अमेरिका, चीन या देशांनी २०३६ पर्यंत चंद्रावर आपला तळ ठोकण्याची तयारी चालविली आहे. भारतानेही अशा प्रकल्पाची घोषणा केली असून २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची ‘इस्रो’ची माेहीम आहे.

टॅग्स :isroइस्रो