शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

२०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, चंद्रयान प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:58 IST

चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

नागपूर : चंद्रयान-३ मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत अवकाशात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राे) ने २०३५ पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. यासाठी इस्राेने तयारी सुरू केली असल्याची माहिती चंद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी दिली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) गुरुवारी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान कार्यक्रम कार्यालयाचे संचालक डॉ. तीर्थ प्रतिम दास, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल उपस्थित होते. पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले की, २०२३ मधील इस्रोची चंद्रयान-३ मोहीम चंद्रावर मानव उतरण्याच्या मोहिमेत मोठे पाऊल ठरले. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे. 

अंतराळवीर १५ दिवस चंद्रावर राहू शकणार?मानवी चंद्र मोहिमेसाठी प्राथमिक काम सुरू झाले आहे. भारताच्या ‘स्पेस स्टेशन प्रोग्राम’मध्ये अंतराळवीरांना १५ ते २० दिवस कक्षेत राहू देण्याची योजना आहे. सध्या ते संकल्पनात्मक टप्प्यात आहे, असे पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले.

अमेरिका चीनबरोबर भारतही मागे नाहीजगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. यात आता भारतही मागे राहिलेला नाही. अमेरिका, चीन या देशांनी २०३६ पर्यंत चंद्रावर आपला तळ ठोकण्याची तयारी चालविली आहे. भारतानेही अशा प्रकल्पाची घोषणा केली असून २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची ‘इस्रो’ची माेहीम आहे.

टॅग्स :isroइस्रो