शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बळी गेल्यावर रस्ता सुधारणार का?

By admin | Updated: July 21, 2016 22:23 IST

नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.

नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.
गावातील दोन प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. पोलीस स्टेशनजवळ, पाण्याची टाकी, सातीबाजार उंचआड, युनियन बँक, भवानीनगर, बसस्थानक आदी ठिकाणी खड्डे आहे. ही स्थिती प्रमुख रस्त्यांची असून गल्लीबोळासह न्यू प्लॉट एरियात रस्त्यानची अवस्था दयनीय होत आहे. पोलीस स्टेशनजवळील रस्त्यावर वाहनाचे टायर तर रस्त्याच्या चकोरीत अटकून अपघात झाले आहे. काहींना दुखापत झाल्याच्या घटना आहे. मात्र सुस्त ग्रामपंचायत साधी डागडुजीही करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता काय एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येणार काय? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. पावसाळ्यात खड्डेंमुळे साचलेल्या पाण्यात खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात व वाहनांचे नुकसान होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

दरम्यान रस्त्यांच्या डागडुजींसह इतर समस्यांबाबत ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज समितीने निवेदने दिली. उपोषणाचा इशारा दिला. मात्र ३० जूनपर्यंत रस्त्यांसह सर्व समस्या मार्गी लागतील असे लेखी आश्वासन सरपंच खिलचंद रोटे, ग्रामविकास अधिकारी डी.आर.शिरतुरे यांनी समितीला दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित झाले. मात्र महिना उलटल तरीही समस्या जैसे थे च आहे. मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. स्मार्ट व्हिलेज समिती व लोकप्रतिनिधी मौन धरून बसले आहे.

पावसाळा सुरू झाला असूनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनास्था का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)