शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ उभी करणार, मन की बातमधून मोदींचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 14:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मन की बात दरम्यान, मोदींनी भगवान श्रीकृष्ण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण काढली. तसेच स्वच्छता अभियान, फिट इंडियासह अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. तसेच महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात प्लॅस्टिकविरोधात व्यापक लोकचळवळीची सुरुवात केली जाईल, असे संकेतही नरेंद्र मोदींनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''गेल्या काही दिवसांत देशवासीयांनी विविध सण साजरे केले. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. मैत्री कशी असावी हे सुदाम्याच्या घटनेवरून आपण जाणू शकतो. तसेच एवढे महान व्यक्तीत्व असूनही, रणांगणात श्रीकृष्णाने सारथ्याची भूमिका बजावली.''यावेळी मोदींनी महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचाही उल्लेख केला. ''आज भारत देश एका मोठ्या उस्तवाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. तो उत्सव म्हणजे महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती. गांधीजींनी शेतकऱ्यांची सेवा केली. चंपारणमध्ये ज्या मिल कामगारांसोबत अन्याय होत होता त्यांची सेवा केली. गांधीजींनी गरीब, निराधार आणि कमकुवत लोकांच्या सेवेला आपले परमकर्तव्य मानले.'' असे मोदी म्हणाले. 

''या 2 ऑक्टोबर रोजी जेव्हा बापूजींचा 150 वी जयंती साजरी केली जाईल. तेव्हा आम्ही उघड्यावरील शौचमुक्त भारत त्यांना समर्पित करू. तसेच त्याच दिवशी प्लॅस्टिकविरोधातील एका व्यापक लोकचळवळीची पायाभरणी करू. आज देशात जागरुकतेअभावी कुपोषणामुळे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही स्तरामधील कुटुंबे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशभरात पोषण अभियान राबवले जाईल.'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात