शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ उभी करणार, मन की बातमधून मोदींचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 14:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मन की बात दरम्यान, मोदींनी भगवान श्रीकृष्ण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण काढली. तसेच स्वच्छता अभियान, फिट इंडियासह अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. तसेच महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात प्लॅस्टिकविरोधात व्यापक लोकचळवळीची सुरुवात केली जाईल, असे संकेतही नरेंद्र मोदींनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''गेल्या काही दिवसांत देशवासीयांनी विविध सण साजरे केले. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. मैत्री कशी असावी हे सुदाम्याच्या घटनेवरून आपण जाणू शकतो. तसेच एवढे महान व्यक्तीत्व असूनही, रणांगणात श्रीकृष्णाने सारथ्याची भूमिका बजावली.''यावेळी मोदींनी महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचाही उल्लेख केला. ''आज भारत देश एका मोठ्या उस्तवाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. तो उत्सव म्हणजे महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती. गांधीजींनी शेतकऱ्यांची सेवा केली. चंपारणमध्ये ज्या मिल कामगारांसोबत अन्याय होत होता त्यांची सेवा केली. गांधीजींनी गरीब, निराधार आणि कमकुवत लोकांच्या सेवेला आपले परमकर्तव्य मानले.'' असे मोदी म्हणाले. 

''या 2 ऑक्टोबर रोजी जेव्हा बापूजींचा 150 वी जयंती साजरी केली जाईल. तेव्हा आम्ही उघड्यावरील शौचमुक्त भारत त्यांना समर्पित करू. तसेच त्याच दिवशी प्लॅस्टिकविरोधातील एका व्यापक लोकचळवळीची पायाभरणी करू. आज देशात जागरुकतेअभावी कुपोषणामुळे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही स्तरामधील कुटुंबे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशभरात पोषण अभियान राबवले जाईल.'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात