शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 05:46 IST

देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे.

नवी दिल्ली : देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे. लोकसहभागातूनच विकास साधता येतो. त्यामुळे न्यू इंडियासाठी ‘टीम इंडिया’ने एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणानंतरच्या भाषणात केले. आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी कट्टरतावाद्यांना दिला.संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचा उत्सवही साजरा करत आहे. सुदर्शन चक्रधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे, असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वा कोटी देशवासीयांतर्फे पंतप्रधान मोदी यांनी नमन केले.१९४२ ते १९४७ या काळात स्वातंत्र्यासाठी भारताने एकीचे बळ दाखवले. त्याचप्रकारे आता नवीन भारत साकारण्यासाठी पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सर्वांनी एकत्र यायचे आहे. एकी हीच आपली खरी ताकद आहे. देशात कुणीही मोठे किंवा लहान नसून सर्व समान आहेत. याच समानतेतून, सकारात्मक विचारातून देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.>चार वर्षांतंील छोटे भाषणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केलेले भाषण चार वर्षांतील सर्वात छोटे म्हणजे ५४ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये बोलताना स्वातंत्र्य दिनाची भाषणे खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रे मिळाल्याचे सांगितले होते. या वेळी स्वातंत्र्यदिनी होणारे भाषण छोटे असेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.‘गाली से ना गोली से, परिवर्तनहोगा कश्मिरी को गले लगाने से’या वेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही मोदींनी आपली भूमिका मांडली. ‘न गाली से, न गोली से... परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से’, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.>ध्वजवंदनानंतर विद्यार्थिनीवर बलात्कारचंदिगढ : स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावरून परतत असतानाएका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना चंदिगढमध्ये घडली आहे. - वृत्त/७