शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 16:44 IST

राज्यातील एआयएडीएमके आणि डीएमके या राजकीय पक्षांकडे इशारा करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे.

नवी दिल्ली - 'थलाइवा' म्हणून प्रसिद्ध असलेले सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणातील आपल्या प्रवेशाची गुरुवारी घोषणा केली. त्याचवेळी पक्षाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असलो तरी मुख्यमंत्री आपल्याला व्हायचे नसल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाचे नेतृत्व ज्या व्यक्तीच्या हाती राहिल, तो व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असा नियम त्यांनी पक्षासाठी ठेवला आहे. चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत रजनीकांत यांनी पक्षस्थापनेसंदर्भात घोषणा केली आहे. तरुण आणि उच्चशिक्षीत लोकांना पक्षात संधी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी पक्षाशी जोडल्या जाणाऱ्या लोकांचा ट्रॅक रेकॉर्ड देखील तपासला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

रजनीकांत यांच्या पक्षात दोन विभाग राहणार असून एका विभागावर पक्ष संघटनेची तर दुसऱ्या विभागावर सरकार चालविण्याची जबाबदारी राहणार आहे. आमच्याकडे मर्यादित लोक आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग योग्य रितीने करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. तामिळनाडूच्या लोकांसाठी आम्ही एक योजना तयार केली आहे. ही योजना घेऊन आम्ही जनतेत जाणार असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.

दरम्यान राज्यातील एआयएडीएमके आणि डीएमके या राजकीय पक्षांकडे इशारा करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. 69 वर्षीय रजनीकांत यांचे नाव शिवाजीराव गायकवाड असून चित्रपटात येण्यापूर्वी ते एसटी बसचे कंडक्टर म्हणून काम करत होते.   

टॅग्स :rajinikanthरजनीकांतPoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडू