शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांविरोधात कौल देण्याची परंपरा मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:42 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभेसाठी शुक्रवारी मतदान होत आहे.

- सुहास शेलारजयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभेसाठी शुक्रवारी मतदान होत असून, गेल्या २५ वर्षांत सत्ताधाºयांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा यंदा कायम राहणार का? याचा फैसला आता मंगळवारी होणार आहे.१९९ जागांसाठी २२८८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पण मुख्य स्पर्धा आहे ती काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विशेष रणनीती आखून प्रचारात घेतलेली आघाडी सर्वेक्षणांचे आकडे व सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढते का? याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग नरेंद्र मोदींनी येथील अलवर जिल्ह्यातून फुंकले होते. त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे. मात्र, भाजपाला राजस्थानातून पायउतार करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. उशिरा का होईना, पण प्रचारात भाजपासारखी आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने ‘मास्टर प्लॅन’ आखला. त्याची धुरा ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याकडे दिली आणि पटेल यांच्या वॉर रुमने दिलेल्या सुचनांनुसार प्रचार केला. शिवाय एक पाऊल पुढे जात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत येताच पहिल्या दहा दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा करुन ६७ टक्के शेतकरी मतदारांना आपल्या पक्षाचा विचार करण्यास भाग पाडले.दिग्गज नेत्यांसमोर तुलबळ प्रतिस्पर्धी उभा करत काँग्रेस-भाजपाने कुरघोडीचे राजकारण खेळण्याचाही प्रयत्न केला. याची सुरुवात केली ती काँग्रेसने. भाजपाच्या गोटातून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या मानवेंद्र सिंह यांना मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात झालरापाटण मतदारसंघातून तिकिट देण्यात आले. वसुंधरा राजेंनी २०१३ च्या निवडणुकीत ६०९८६ मतांची आघाडी घेत विजय मिळविला होता. तेव्हा राजपूतांचा भाजपाला पाठिंबा होता. मात्र, गुंड आनंदपाल एन्काउंटर प्रकरणात ‘राजे’ सरकारने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर पद्मावत चित्रपट प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे राजपूतांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या विरोधात मानवेंद्र यांच्या रुपात राजपूत उमेदवार देऊन काँग्रेसने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या या खेळीचा बदलाही राजेंनी घेतलाच. ज्या सचिन पायलट यांनी राजेंविरोधात मानवेंद्र यांना उतरविण्याचा निर्णय घेतला, त्यांची वाट बिकट करण्यासाठी वसुंधरा राजे यांनी आपला विश्वासू सरदार युनुस खान यांना टोंक मतदारसंघातून अगदी शेवटच्या क्षणी यादीत फेरबदल करीत तिकिट दिले. टोंक मतदारसंघात मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, युनुस खान आणि पायलट या दोघांनाही हा मतदारसंघ नवखा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या कन्हैयालाल यांनी टोंक मतदारसंघातून प्रतिस्पध्यार्ला ४०,२२१ मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे पायलट यांना येथे कडवी झुंज मिळू शकते.२०१३ च्या निवडणुकीत एससी-एसटी आणि ओबीसी प्रवगार्साठी राखीव असलेल्या ५९ जागांपैकी ५० जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. उरलेल्या नऊ जागांवर नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेसकडून त्यांना कडवी झुंज मिळाली होती. मात्र यंदा नॅशनल पीपल्स पार्टीचे किरोडीलाल मीणा यांनी आपल्या पक्षाचे भाजपात विलिनिकरण केल्याने भाजपाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. असे असले तरी आरक्षणावरून गुर्जर समाज भाजपावर नाराज आहे. त्याशिवाय आदिवासींसाठी २०१३ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने आदिवासी समाजही भाजपावर नाराज आहे. त्यात बंडखोरीमुळे होणारे मतांचे ध्रुवीकरण भाजपासाठी चिंतेचे कारण आहे. या साºयाचे परिणाम मतदानावर कितपत होतात ते निकाल लागल्यानंतरच समजेल.>...या जागांवर ‘करो या मरो’गेल्या निवडणुकीत काही उमेदवार अगदी ३०० ते७०० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यातनॅशनल पीपल्स पार्टीचे नवीन पलानिया (अंबर), काँग्रेसचे नारायण सिंह (दंत रामगड), काँग्रेसचेभानवर सिंह (कोलायत), भाजपाच्या भीमा बाई (कुशालगड), नॅशनल पीपल्स पार्टीचे डॉ. किरोडीलाल मीणा (लालसोत), भाजपाच्या अनिता कटारा (सागवारा) यांचा समावेश आहे. मात्र, यंदा या सर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अपक्षांनी आव्हान निर्माण केल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा कोणत्या पक्षाच्या हातीजातात, याकडेही विश्लेषकांचे लक्ष आहे

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक