शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

महाराष्ट्रात पुन्हा होणार बैलगाड्यांच्या शर्यती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:57 IST

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू करण्यातील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू करण्यातील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे.तामिळनाडूमध्ये बैलांचा जलिकट्टु हा खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यती यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. पशुप्रेमी संघटनांनी या खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती.पशुंना या खेळांमध्ये क्रूर वागणूक दिली जाते, असा त्या संघटनांचा आक्षेप होता. दुसरीकडे बैलगाड्यांच्या शर्यतीत कोणतेही क्रौर्य नाही आणि हा आमचा पारंपरिक खेळ आहे, असे या शर्यती आयोजित करणाºयांचे म्हणणे होते.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर जलिकट्टू खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेने बैलगाडा शर्यती विधेयक संमत केले होते. ते संमत झाल्यावर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेले होते. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.राज्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करता याव्यात, यासाठी विधानसभेत पशु क्रुरता प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले होते. ते मंजूर होऊ नही त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी नसल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले नव्हते. ती स्वाक्षरी झाली असल्याची माहिती बुधवारी देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषत: पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.