शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांचा इतिहास यावेळी बदलेल? हिमाचलमधील जनता कोणाला कौल देणार? पाहा, सत्तेची समीकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 06:10 IST

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता प्रचाराच्या तोफा आणखी जोरात धडाडणार आहेत.

चंद्रकांत दडस । लोकमत न्यूज नेटवर्क ।हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता प्रचाराच्या तोफा आणखी जोरात धडाडणार आहेत. राज्यातील सत्तेची समीकरणे समजून घेतली तर गेल्या ३२ वर्षांत काँग्रेस आणि भाजपला आळीपाळीने सरकारमध्ये बसण्याची संधी येथील जनतेने दिली आहे. यावर्षी नेमकी कोणाची सत्ता येईल, हे समजून घेऊ.

पहिले मुख्यमंत्री कोण होते? 

१९६२ : पहिल्या विधानसभेपासून हिमाचल विधानसभेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. १९६२ : विधानसभेत हिमाचलमध्ये काँग्रेसला विजय मिळाला आणि यशवंतसिंह परमार राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७७ पर्यंत यशवंतसिंह परमार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९७  : पहिल्यांदा हिमाचलमध्ये बिगर काँग्रेस सरकार म्हणजे जनता पक्षाचे सरकार आले. १९७७ ते १९८२ पर्यंत जनता पक्षाच्या सरकारमध्ये शांता कुमार राज्याचे मुख्यमंत्री होते.

काँग्रेसला पुन्हा यश

१९८२  च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा जिंकली आणि यावेळी ठाकूर रामलाल राज्याचे मुख्यमंत्री झाले; पण मध्येच वीरभद्र सिंह यांना हटवून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९८५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आणि वीरभद्र सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते १९९० पर्यंत सत्तेत राहिले. 

निवडणुकीतील चेहरा कोण? 

भाजप सध्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा चेहरा समोर करून निवडणूक लढवणार आहे. मात्र, मोठा चेहरा पंतप्रधान मोदींचा आहे. जयराम ठाकूर यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश चंबेल सिंह कश्यप हेही पुढे आहेत. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे. 

आळीपाळीने सरकार कधीपासून?

१९९०विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले. शांता कुमार राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राज्यात आळीपाळीने भाजप व काँग्रेसची सत्ता आहे. २०१२मध्ये काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आली. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आला. 

या निवडणुकीत नवे काय? 

यावेळी ८० वर्षांवरील वृद्ध आणि कोरोनाग्रस्तांना घरबसल्या मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. येथे ११८४ मतदारांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे. मोफत योजनांच्या घोषणेवर निवडणूक आयोग यावेळी लक्ष ठेवणार आहे. 

मुख्यमंत्री कोण होणार? 

मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही शर्यतीत आहेत. काँग्रेसकडून प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, कौलसिंह ठाकूर, सुखविंदर सिंग सुक्खू आघाडीवर आहेत.

राज्यातील निवडणुकीचे मुद्दे काय आहेत?  

येथील पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. भाजपने विकासासोबतच सुरक्षा, सर्वसामान्यांना दिलासा, गरीब आणि शेतकरी मजबूत करण्याचा मुद्दा घेतला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूक