शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शहीद जवानाची पत्नी म्हणते, युद्ध नको, शांतताच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:19 IST

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले.

कोलकाता : भारत आणि पाकिस्तानने तणाव न वाढवता चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान बबलू संतरा यांच्या विधवा पत्नी मीता संतरा यांनी गुरुवारी केले.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले. त्यात बबलू संतरा यांचाही समावेश होता. ‘मी युद्धाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्यावर समाज माध्यमातून होणाऱ्या टीकेबद्दल मला काळजी वाटत नाही’, असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तानने बुधवारी ताब्यात घेतलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने सर्व ते प्रयत्न करावेत, असे आवाहनही मीता संतरा यांनी केले. ‘आम्ही आणखी अनेक बळी घेणाऱ्या युद्धाऐवजी संवादाला संधी दिली पाहिजे, असे त्या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या. वर्धमान यांना परत आणण्यासाठी सरकारने पाकिस्तानशी बोलणी करावी, असे त्या म्हणाल्या.युद्धात दोन्ही बाजुंकडील जीवित हानीसह त्याचे आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवरही परिणाम होतात, असे संतरा म्हणाल्या. सशस्त्रदलांना युद्धावर जावे लागून सर्वोच्च बलिदानही करावे लागते. हे स्वाभाविक असले तरी भारत सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, असे मीता म्हणाल्या. सुरक्षा दले सुरक्षित राहिली पाहिजेत, असे मला वाटते.सीआरपीएफलाही सुरक्षा हवीलष्कर किंवा सीआरपीएफ किंवा आयटीबीपी ही निमलष्करी दले असोत ती भारत सरकारची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला