शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

एप्रिलपासून इन-हँड सॅलरी घटणार; नोकरदारांनो, जाणून घ्या तुमचं आर्थिक गणित कसं बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:58 IST

वेतन संहिता येत्या एप्रिल महिन्यापासून लागू केली जाणार

४४ केंद्रीय कामगार कायद्यांपैकी केंद्र सरकारने २९ कायदे एकत्रित करून नवीन वेतन संहिता तयार केली आहे. वेतन संहिता, २०१९ (कोड ऑफ वेजेस) असे त्याचे नाव असून गेल्या वर्षी संसदेत त्यास मान्यता देण्यात आली. ही वेतन संहिता येत्या एप्रिल महिन्यापासून लागू केली जाणार आहे.सद्य:स्थिती काय?एरवी रोजगारकर्ते (एम्प्लॉयर) कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (बेसिक पे) व महागाई भत्ता यांच्या बेरजेच्या १२% रक्कम पगारातून कापून तेवढ्याच रकमेची त्यात भर घालत कर्मचाऱ्याच्या पीएफमध्ये भरतातत्यामुळे रोजगारकर्ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या पे-स्लिपमध्ये मूळ वेतनाची रक्कम कमी दाखवतात. इतर भत्त्यांची संख्या मात्र जास्त असतेअसे केल्याने रोजगारकर्त्यांना भविष्य निर्वाह निधीतला त्यांचा वाटा कमी प्रमाणात भरता येतो. ग्रॅच्युईटीही कमी भरावी लागतेसध्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार आणि इतर भत्ते याला कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) असे संबोधले जातेएप्रिलनंतर काय? नव्या वेतन संहितेमध्ये काही विशिष्ट बाबींचा समावेश करण्यात आला आहे तर काही गोष्टी बाद करण्यात आल्या आहेत पगारातील भत्त्यांचे प्रमाण एकूण वेतनाच्या ५० टक्क्यांहून अधिक असायला नको.  त्यामुळे कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या निम्मे पगार हे त्याचे मूळ वेतन असणार.  रोजगारकर्त्यांना मूळ वेतनाचे प्रमाण वाढवावे लागणार साहजिकच पीएफ आणि  ग्रॅच्युईटीतील योगदानही वाढणार  त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात येणारा पगार कमी होणारवेतनात कशाचा समावेश? मूळ वेतन, महागाई भत्ता आणि राखीव भत्ता (रिटेनिंग अलाऊन्स) हे वेतन म्हणून ग्राह्य धरले जातील.वेतनाच्या व्याख्येत पुढील गोष्टींचा समावेश नसेलसानुग्रह अनुदान, निवासासाठी दिलेले घर, वीज जोडणी, पाणी पुरवठा किंवा तत्सम इतर सुविधा.  रोजगारकर्त्यांचे भविष्य निर्वाह निधी वा इतर कोणत्याही निवृत्ती योजनेतील योगदानवाहन भत्ता. कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपावरून विशिष्ट खर्चाची भरपाई करण्यासाठी दिलेली रक्कम. घरभाडे भत्ता. जादा कामासाठीचा भत्ता. ग्रॅच्युईटीतील योगदानकर्मचाऱ्यांना भविष्यात असा होईल फायदा?सध्या हातात कमी पगार येणार असला तरी भविष्यातील आर्थिक तरतूद यामुळे होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीतील योगदान वाढून निवृत्तीनंतर भरघोस रक्कम हाती राहील.