शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:11 IST

राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचे प्रत्युत्तर, पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील मतफेरफारबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हरयाणातील मतदार याद्यांविरोधात एकही अपील दाखल झालेले नाही आणि अनेकवार मतदान झाल्याचे कोणतेही प्रकार आढळून आले नाहीत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. २०२४ला हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेकवार मतदान करणाऱ्यांबाबत काँग्रेसच्या बूथ एजंटनी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही निवडणूक आयोगाने विचारला.

हरयाणामध्ये मतदार याद्यांमध्ये २५ लाख बनावट नोंदी आहेत. तसेच, या राज्यातील विधानसभा निवडणूक चोरण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला. त्याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल गांधींनी हरयाणातील राय व होडल विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख केला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमधील निवडणुकांबद्दलचे आक्षेप व त्याविषयीचे सर्व पुरावे गांधी यांनी न्यायालयात सादर करावेत.

‘घर क्रमांक प्रलंबित आहे 

‘घर क्रमांक शून्य’ मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यांना ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांनी अद्याप घर क्रमांक दिलेला नाही त्यांनाही ‘घर क्रमांक ०’ दिला जातो. जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी घर क्रमांक देणं प्रलंबित आहे, अशा ठिकाणी बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी ‘घर क्रमांक शून्य’ दिला आहे.

डुप्लिकेट नावे काढत का नाही?

निवडणूक आयोग मतदारयाद्यांतील डुप्लिकेट नावे काढून का टाकत नाही, असा सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले की, अशी नावे काढली तर निवडणुका निष्पक्ष पद्धतीने होतील. मात्र काही लोकांना निष्पक्ष निवडणुका नको आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्यावर्षी झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा विजय होणार असा बहुतांश एक्झिट पोलचा निष्कर्ष होता. पाच मोठ्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांत काँग्रेसच्याच विजयाची हमी देण्यात आली होती. विचित्र गोष्ट म्हणजे हरयाणामध्ये पहिल्यांदाच टपाल मतपत्रिकांचे निकाल प्रत्यक्ष निकालांपासून वेगळे होते.

खोटा व बिनबुडाचा आरोप : भाजप

हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप ‘खोटा आणि बिनबुडाचा’ असल्याचा दावा भाजपने केला. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत असून, ते देशातील लोकशाहीची बदनामी करीत असल्याची टीका भाजपने केली.

...हे काँग्रेसच्या मतदान एजंटांचे कर्तव्य

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे मतदान एजंट मतदान केंद्रांमध्ये काय करत होते? मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा त्याची ओळख संशयास्पद वाटत असेल, तर त्यावर आक्षेप घेणे हे काँग्रेसचे मतदान एजंटांचे कर्तव्य होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why weren't Haryana election flaws raised earlier? Asks Election Commission.

Web Summary : Election Commission refutes Rahul Gandhi's claims of voter fraud in Haryana. They question why Congress agents didn't object to multiple voting during the elections. BJP calls Gandhi's allegations baseless, accusing him of defaming democracy to hide failures.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग