शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:11 IST

राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचे प्रत्युत्तर, पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील मतफेरफारबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हरयाणातील मतदार याद्यांविरोधात एकही अपील दाखल झालेले नाही आणि अनेकवार मतदान झाल्याचे कोणतेही प्रकार आढळून आले नाहीत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. २०२४ला हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेकवार मतदान करणाऱ्यांबाबत काँग्रेसच्या बूथ एजंटनी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही निवडणूक आयोगाने विचारला.

हरयाणामध्ये मतदार याद्यांमध्ये २५ लाख बनावट नोंदी आहेत. तसेच, या राज्यातील विधानसभा निवडणूक चोरण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला. त्याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल गांधींनी हरयाणातील राय व होडल विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख केला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमधील निवडणुकांबद्दलचे आक्षेप व त्याविषयीचे सर्व पुरावे गांधी यांनी न्यायालयात सादर करावेत.

‘घर क्रमांक प्रलंबित आहे 

‘घर क्रमांक शून्य’ मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यांना ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांनी अद्याप घर क्रमांक दिलेला नाही त्यांनाही ‘घर क्रमांक ०’ दिला जातो. जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी घर क्रमांक देणं प्रलंबित आहे, अशा ठिकाणी बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी ‘घर क्रमांक शून्य’ दिला आहे.

डुप्लिकेट नावे काढत का नाही?

निवडणूक आयोग मतदारयाद्यांतील डुप्लिकेट नावे काढून का टाकत नाही, असा सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले की, अशी नावे काढली तर निवडणुका निष्पक्ष पद्धतीने होतील. मात्र काही लोकांना निष्पक्ष निवडणुका नको आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्यावर्षी झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा विजय होणार असा बहुतांश एक्झिट पोलचा निष्कर्ष होता. पाच मोठ्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांत काँग्रेसच्याच विजयाची हमी देण्यात आली होती. विचित्र गोष्ट म्हणजे हरयाणामध्ये पहिल्यांदाच टपाल मतपत्रिकांचे निकाल प्रत्यक्ष निकालांपासून वेगळे होते.

खोटा व बिनबुडाचा आरोप : भाजप

हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप ‘खोटा आणि बिनबुडाचा’ असल्याचा दावा भाजपने केला. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत असून, ते देशातील लोकशाहीची बदनामी करीत असल्याची टीका भाजपने केली.

...हे काँग्रेसच्या मतदान एजंटांचे कर्तव्य

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे मतदान एजंट मतदान केंद्रांमध्ये काय करत होते? मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा त्याची ओळख संशयास्पद वाटत असेल, तर त्यावर आक्षेप घेणे हे काँग्रेसचे मतदान एजंटांचे कर्तव्य होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why weren't Haryana election flaws raised earlier? Asks Election Commission.

Web Summary : Election Commission refutes Rahul Gandhi's claims of voter fraud in Haryana. They question why Congress agents didn't object to multiple voting during the elections. BJP calls Gandhi's allegations baseless, accusing him of defaming democracy to hide failures.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग