शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

४६० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी ललित मोदीना का मदत केली - काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

By admin | Updated: August 12, 2015 13:27 IST

ललित मोदींनी आयपीएल घोटाळा प्रकरणात ४६० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असताना त्यांना तथाकथित मानवतावादी दृष्टीने सुषमा स्वराज यांनी का केली याचा खुलासा व्हायलाच हवा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - ललित मोदींनी आयपीएल घोटाळा प्रकरणात ४६० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असताना त्यांना तथाकथित मानवतावादी दृष्टीने सुषमा स्वराज यांनी का केली याचा खुलासा व्हायलाच हवा, तसेच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे ललित मोदींशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात भाजपावर घणाघाती हल्ला चढवला.

पावसाळी अधिवेशनाचा आत्तापर्यंतचा काळ वाया गेला असून अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना काँग्रेसने गोंधळ संपवत चर्चेचा मार्ग स्वीकारला. लोकसभा अध्यक्षांनी ललितगेट प्रकरणावर बोलण्यासाठी १५० मिनिटांचा कालावधी दिला आहे. जर ललित मोदींच्या आजारी पत्नीला मदत करायची होती तर सुषमा स्वराज यांनी कायद्याच्या मार्गाने मदत करायला हवी होती त्यासाठी कायदा गुंडाळून ठेवायची काय गरज होती असा सवाल स्वराज यांना खर्गे यांनी विचारला आहे.

ललित मोदींच्या व्हिसासाठी ब्रिटीश सरकारला फोनवरून बोलताना स्वराज यांनी आपली हरकत नसल्याचे कळवले आणि भारतात अर्थखात्याला चौकशीसाठी हवा असलेल्या एका आरोपीला मदत केल्याचे स्पष्ट होत असल्याचे खर्गे यांनी सांगितले. खर्गे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:

 

- ललित मोदी आलिशान रिसॉर्टमध्ये, युरोपीय देशांमध्ये सुट्टी घालवत होते, त्यांना तुम्ही माणूसकीच्या दृष्टिकोनातून मदत कशी केली ?.
- ज्या व्यक्तीला तुम्ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत केली, त्याची प्राथमिकता हे त्याच्या आजारी पत्नीवरील उपचार नव्हते तर इतर गोष्टी होत्या.
- चिदंबरम यांनी ब्रिटनशी केलेला पत्रव्यवहार प्रसिद्ध करा.

- जर सुषमा स्वराज यांना मोदींना मदत करायची होती तर त्यांनी मोदींना भारतात बोलवायला हवे होते. उच्चायुक्त, सेक्रेटरी कोणालाही न कळवता सुषमा यांनी मोदींना मदत केली. कायद्याचे उल्लंघन करत मदत करणे हा मोठा गुन्हा.

- जर तुम्हाला माणुसकीच्या दृष्टीने मदत करायची होती तर ती कायद्याच्या चौकटीत राहून करायला हवी होती.

- परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींच्या पासपोर्टविरोधात कोर्टात अपील का केले नाही?.

- ज्या व्यक्तीविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली, त्यांना स्वराज यांनी मदत का केली ?.

- ललित मोदींकडून सुषमा स्वराज यांना आर्थिक लाभ झाला आहे.

- पंतप्रधान फक्त रेडिओ, टीव्हीवरच बोलतात, सदनात का नाही?.

- लोकसभेतील गोंधळाला सरकारच जबाबदार. सरकार याआधीच चर्चेला तयार झाले असते तर संसदेचे इतके दिवस वाया गेले नसते.

- आम्ही लोकसभेत गोंधळ घालण्याच्या विरोधात.