शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:02 IST

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. - चौधरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रापासून ते चित्त्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर बोलतात, पण ते मणिपूरवर बोलत नाही. त्यांनी मणिपूरप्रश्नी ‘मन की बात’ करायला हवी होती, असे मत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.

चौधरी म्हणाले, आम्हाला प्रश्न पडला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत का येत नाही, मणिपूरप्रश्नी ते बोलत का नाही, त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. त्यांनी किमान एकदा तरी मणिपूरबाबत ‘मन की बात’ केली असती, तर काय बिघडले असते? त्यांना सर्व प्रश्नांवर बोलायला वेळ आहे, चंद्रापासून ते कुनोतील चित्त्यांवर बोलायला वेळ आहे, पण मणिपूरविषयी ते गप्प राहतात.

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्हाला देशाच्या जनतेशी देणे-घेणे आहे. आम्ही मणिपूरची अवस्था पाहिली, गंभीर परिस्थिती तिथे आहे. पण देशाचे नेतृत्व म्हणून तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी किमान दोन शब्द बोलायला हवे होते.     अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे नेते 

विरोधकांचा सभात्यागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात अनेक वेळ मणिपूरवर वक्तव्य न केल्याने विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.

तुम्ही स्वप्ने दाखवता, आम्ही साकार करतो - निर्मला 

संपुआ सरकारच्या काळात सर्वसामान्य व गरिबांना अनेक मूलभूत गरजांची पूर्तता होणार म्हणून स्वप्ने दाखवली जायची. गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांची ही स्वप्ने साकार केली, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. २०१४ आणि २०१९ मध्ये जनतेने संपुआवर जो अविश्वास दाखवला त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला सीतारामन यांनी लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षांना लगावला.

सध्या दोनशे रुपये किलो दराने विकले जात असलेल्या टोमॅटोचे दर दिल्लीत लवकरच ७० रुपये प्रतिकिलो होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून खरेदी करून टोमॅटो दिल्लीत ७० रुपये दराने उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी, २०१३ला जगातील पाच सर्वांत नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होता. तिथून नऊ वर्षांत कोरोनापश्चातही भारताची अर्थव्यवस्था सुधारून आज जगातील सर्वांत वेगवान वाढ नोंदविणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था२०२३-२४ मध्ये ६.५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणाकेल्यामुळे शक्य झाले.         - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री  

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन