शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मग्रंथांतही उल्लेख नसलेली ‘जात’ अजून जात का नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 05:50 IST

खरं तर निसर्गानं ‘माणूस’ ही एकच ‘जात’ निर्माण केली. माणसाने मात्र श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं.

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

धर्म, जात, पोटजात, पंथ, आदी गोष्टींचे सर्वांत जास्त अवडंबर कुठे मांडले जात असेल, तर ते भारतात. इतिहासात जरा खोलवर डोकावले तर लक्षात येईल, धर्म ही संकल्पना सर्वच धर्मग्रंथांत फार उदात्त अर्थ सांगते. समाजात वावरताना सर्वच स्तरावर, नीतिमत्ता, कायदे, सद्गुण आणि सामाजिक सलोखा जपून ठेवण्यासाठी जी सर्वसाधारण वागण्याची पद्धत, आचरण नियम सांगितले जातात, त्याला धर्म असे थोडक्यात म्हटले जाते. म्हणजेच, जगण्यासाठीचा योग्य मार्ग यात सांगितला जातो. जे लोक ही नीतिमत्ता, नियम पाळणार नाहीत, ते ‘अधर्मी’, इतकी सहज, सोपी व्याख्या आपण यात पाहू शकतो.

पुढे कालौघात ‘वर्ण’ या संकल्पनेची उत्पत्ती झाली.. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले. मात्र, कालांतराने या वर्ण व्यवस्थेचा विपर्यास होत श्रेष्ठत्ववाद बोकाळला आणि समाजात कर्मकांड, यज्ञयाग, कुप्रथा यांचे स्तोम माजले. ‘जाती’ या शब्दाचाही भारतीय धर्मग्रंथांत कुठेही उल्लेख आढळत नाही. फार तर ‘ज्ञाती’ हा शब्द काही ठिकाणी पाहायला मिळतो असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ज्ञाती म्हणजे देखील आजची ‘जाती’ नव्हेच. ज्ञाती म्हणजे ‘जन्म’. ‘जात’ या भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असणाऱ्या शब्दाचा शोध घेतला, तर काही समाजशास्त्रज्ञांच्या मते जात ही सामाजिक स्तरीकरणाची एक व्यवस्था होती. पुढे यात अनेक कांगोरे वाढत गेले. व्यवसाय, व्यापार, रोटी-बेटी व्यवहार, आदी गोष्टी सामावून याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. असं असलं तरी सर्व जातींना व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र्य होते, असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्वच लोक शेती करत असत आणि युद्धातदेखील एकत्र शस्त्रास्त्रे घेऊन लढायला जात असत, हेही इतिहासात आपण पाहतो. मग जात या शब्दात बदल कधी झाले? कधीपासून यात श्रेष्ठ, हीन भावना गुंतत गेल्या? 

- ब्रिटिश काळात आर्थिक स्वार्थासाठी इंग्रजांनी या सामाजिक स्तराला त्यांच्या ‘कास्ट’ या शब्दात अंतर्भूत केले. कास्ट हा इंग्रजी शब्द, ‘कास्टा’ या पोर्तुगीज शब्दापासून बनला होता. तो इंग्रजांनी त्यांच्या आर्थिक आणि वसाहतवादी राजकीय स्वार्थासाठी भारतातील समाजावर चिकटवून दिला. त्यांनी आपल्या पदरी असलेल्या प्रशासकीय सेवेत, जातीय श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच.. असे भेद करून लोकांच्या नेमणुका केल्या.

‘फोडा आणि राज्य करा’ ही गलिच्छ कूटनीती समाजात दृढ करत, जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष पेटवून त्यांच्या ‘एक’ होण्याला सुरुंग लावला. स्वातंत्र्यानंतरदेखील इंग्रजांनी पेरून ठेवलेला हा भेद भारतीयांच्या डोक्यातून गेला नाही. मूळ भारतीय तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांना बगल देत लोक कित्येक धर्म, जाती-पोटजातीत विभागले गेले. 

तसं पाहायला गेलं, तर निसर्गाने माणसाची माणूस ही एकच जात निर्माण केली. फार तर नैसर्गिक कर्म आणि लिंगभेदाने, स्त्री आणि पुरुष या दोन जाती आपण म्हणू शकू. जन्म ते मृत्यूपर्यंत शारीरिक, मानसिक, भावनिक असे कुठलेच भेद निसर्गाने माणसाला दिले नसताना, माणसाने मात्र अहंकारापोटी श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला ‘जात’ नावाच्या संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं आहे.

विकास साधायचा असेल, तर सामाजिकरीत्या विखुरलेले माणूसपण आपल्याला एकसंध करावे लागेल. सामाजिक सलोखा राखण्यासाठी, जिथे धर्मात नीतिमत्ता सांगितली जात होती, तिथे अराजकता माजवण्यासाठी आता जात वापरली जात आहे. या देशाच्या कुठलाही ग्रंथात साधा शाब्दिक आधारदेखील नसलेली अशी ही ‘जात’ जात का नाही? - कारण आपणच तिला घालवत नाही. स्वार्थी विचारांनी आलेलं हे विषारी पीक आपली विखारी पाळेमुळे घट्ट रोवून घराघरांत विद्वेषाचे विष पसरवत आहे. कारण त्याला आपणच अविचारांचे खतपाणी घालत वाढवत आहोत. जात केवळ स्वार्थ साधण्यासाठीच वापरली जात आहे, हे वास्तव ओळखून आता सामान्य जनतेनेच ही जातीय भेदाभेद स्वतःहून समाजातून घालवायला हवी.