शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मग्रंथांतही उल्लेख नसलेली ‘जात’ अजून जात का नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 05:50 IST

खरं तर निसर्गानं ‘माणूस’ ही एकच ‘जात’ निर्माण केली. माणसाने मात्र श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं.

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

धर्म, जात, पोटजात, पंथ, आदी गोष्टींचे सर्वांत जास्त अवडंबर कुठे मांडले जात असेल, तर ते भारतात. इतिहासात जरा खोलवर डोकावले तर लक्षात येईल, धर्म ही संकल्पना सर्वच धर्मग्रंथांत फार उदात्त अर्थ सांगते. समाजात वावरताना सर्वच स्तरावर, नीतिमत्ता, कायदे, सद्गुण आणि सामाजिक सलोखा जपून ठेवण्यासाठी जी सर्वसाधारण वागण्याची पद्धत, आचरण नियम सांगितले जातात, त्याला धर्म असे थोडक्यात म्हटले जाते. म्हणजेच, जगण्यासाठीचा योग्य मार्ग यात सांगितला जातो. जे लोक ही नीतिमत्ता, नियम पाळणार नाहीत, ते ‘अधर्मी’, इतकी सहज, सोपी व्याख्या आपण यात पाहू शकतो.

पुढे कालौघात ‘वर्ण’ या संकल्पनेची उत्पत्ती झाली.. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले. मात्र, कालांतराने या वर्ण व्यवस्थेचा विपर्यास होत श्रेष्ठत्ववाद बोकाळला आणि समाजात कर्मकांड, यज्ञयाग, कुप्रथा यांचे स्तोम माजले. ‘जाती’ या शब्दाचाही भारतीय धर्मग्रंथांत कुठेही उल्लेख आढळत नाही. फार तर ‘ज्ञाती’ हा शब्द काही ठिकाणी पाहायला मिळतो असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ज्ञाती म्हणजे देखील आजची ‘जाती’ नव्हेच. ज्ञाती म्हणजे ‘जन्म’. ‘जात’ या भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असणाऱ्या शब्दाचा शोध घेतला, तर काही समाजशास्त्रज्ञांच्या मते जात ही सामाजिक स्तरीकरणाची एक व्यवस्था होती. पुढे यात अनेक कांगोरे वाढत गेले. व्यवसाय, व्यापार, रोटी-बेटी व्यवहार, आदी गोष्टी सामावून याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. असं असलं तरी सर्व जातींना व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र्य होते, असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्वच लोक शेती करत असत आणि युद्धातदेखील एकत्र शस्त्रास्त्रे घेऊन लढायला जात असत, हेही इतिहासात आपण पाहतो. मग जात या शब्दात बदल कधी झाले? कधीपासून यात श्रेष्ठ, हीन भावना गुंतत गेल्या? 

- ब्रिटिश काळात आर्थिक स्वार्थासाठी इंग्रजांनी या सामाजिक स्तराला त्यांच्या ‘कास्ट’ या शब्दात अंतर्भूत केले. कास्ट हा इंग्रजी शब्द, ‘कास्टा’ या पोर्तुगीज शब्दापासून बनला होता. तो इंग्रजांनी त्यांच्या आर्थिक आणि वसाहतवादी राजकीय स्वार्थासाठी भारतातील समाजावर चिकटवून दिला. त्यांनी आपल्या पदरी असलेल्या प्रशासकीय सेवेत, जातीय श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच.. असे भेद करून लोकांच्या नेमणुका केल्या.

‘फोडा आणि राज्य करा’ ही गलिच्छ कूटनीती समाजात दृढ करत, जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष पेटवून त्यांच्या ‘एक’ होण्याला सुरुंग लावला. स्वातंत्र्यानंतरदेखील इंग्रजांनी पेरून ठेवलेला हा भेद भारतीयांच्या डोक्यातून गेला नाही. मूळ भारतीय तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांना बगल देत लोक कित्येक धर्म, जाती-पोटजातीत विभागले गेले. 

तसं पाहायला गेलं, तर निसर्गाने माणसाची माणूस ही एकच जात निर्माण केली. फार तर नैसर्गिक कर्म आणि लिंगभेदाने, स्त्री आणि पुरुष या दोन जाती आपण म्हणू शकू. जन्म ते मृत्यूपर्यंत शारीरिक, मानसिक, भावनिक असे कुठलेच भेद निसर्गाने माणसाला दिले नसताना, माणसाने मात्र अहंकारापोटी श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला ‘जात’ नावाच्या संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं आहे.

विकास साधायचा असेल, तर सामाजिकरीत्या विखुरलेले माणूसपण आपल्याला एकसंध करावे लागेल. सामाजिक सलोखा राखण्यासाठी, जिथे धर्मात नीतिमत्ता सांगितली जात होती, तिथे अराजकता माजवण्यासाठी आता जात वापरली जात आहे. या देशाच्या कुठलाही ग्रंथात साधा शाब्दिक आधारदेखील नसलेली अशी ही ‘जात’ जात का नाही? - कारण आपणच तिला घालवत नाही. स्वार्थी विचारांनी आलेलं हे विषारी पीक आपली विखारी पाळेमुळे घट्ट रोवून घराघरांत विद्वेषाचे विष पसरवत आहे. कारण त्याला आपणच अविचारांचे खतपाणी घालत वाढवत आहोत. जात केवळ स्वार्थ साधण्यासाठीच वापरली जात आहे, हे वास्तव ओळखून आता सामान्य जनतेनेच ही जातीय भेदाभेद स्वतःहून समाजातून घालवायला हवी.