शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भारतीयांना विदेश का आवडतोय ? ८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:15 IST

यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षामध्ये ८ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपला देश सोडून का जात आहेत, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले.

कोणत्या देशांमध्ये जात आहेत भारतीय? बहुतांश भारतीय हे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, यूएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती देत आहेत.

परदेशात स्थायिक होण्याची कारणे काय?

चांगले राहणीमान परदेशात राहणीमान चांगले आहे. शिक्षण दर्जेदार आहे. याशिवाय आरोग्य व इतर सुविधादेखील चांगल्या असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे.

भरघोस पगार रोजगाराच्या चांगल्या संधी आणि भरघोस पगार, यासाठीही भारतीय इतर देशांत जात आहेत. कामाचे निश्चित तास तसेच नियम व कायद्यांचे काटेकोर पालन होते, अशा देशांना भारतीय पसंती देत आहेत.

करसवलती अनेक देशांमध्ये बरीच कर सवलत मिळते. कररचनाही वेगळी असते. व्यवसायासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे अशा देशांमध्ये स्थायिक होण्यास भारतीय प्राधान्य देत आहेत.

मजबूत पासपोर्ट भारतीय पासपोर्टवर ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. मात्र, यापेक्षा मजबूत पासपोर्ट असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया आदींचा यात समावेश आहे.