शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना विदेश का आवडतोय ? ८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:15 IST

यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षामध्ये ८ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपला देश सोडून का जात आहेत, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले.

कोणत्या देशांमध्ये जात आहेत भारतीय? बहुतांश भारतीय हे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, यूएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती देत आहेत.

परदेशात स्थायिक होण्याची कारणे काय?

चांगले राहणीमान परदेशात राहणीमान चांगले आहे. शिक्षण दर्जेदार आहे. याशिवाय आरोग्य व इतर सुविधादेखील चांगल्या असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे.

भरघोस पगार रोजगाराच्या चांगल्या संधी आणि भरघोस पगार, यासाठीही भारतीय इतर देशांत जात आहेत. कामाचे निश्चित तास तसेच नियम व कायद्यांचे काटेकोर पालन होते, अशा देशांना भारतीय पसंती देत आहेत.

करसवलती अनेक देशांमध्ये बरीच कर सवलत मिळते. कररचनाही वेगळी असते. व्यवसायासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे अशा देशांमध्ये स्थायिक होण्यास भारतीय प्राधान्य देत आहेत.

मजबूत पासपोर्ट भारतीय पासपोर्टवर ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. मात्र, यापेक्षा मजबूत पासपोर्ट असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया आदींचा यात समावेश आहे.