शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भारतीयांना विदेश का आवडतोय ? ८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:15 IST

यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षामध्ये ८ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपला देश सोडून का जात आहेत, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले.

कोणत्या देशांमध्ये जात आहेत भारतीय? बहुतांश भारतीय हे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, यूएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती देत आहेत.

परदेशात स्थायिक होण्याची कारणे काय?

चांगले राहणीमान परदेशात राहणीमान चांगले आहे. शिक्षण दर्जेदार आहे. याशिवाय आरोग्य व इतर सुविधादेखील चांगल्या असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे.

भरघोस पगार रोजगाराच्या चांगल्या संधी आणि भरघोस पगार, यासाठीही भारतीय इतर देशांत जात आहेत. कामाचे निश्चित तास तसेच नियम व कायद्यांचे काटेकोर पालन होते, अशा देशांना भारतीय पसंती देत आहेत.

करसवलती अनेक देशांमध्ये बरीच कर सवलत मिळते. कररचनाही वेगळी असते. व्यवसायासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे अशा देशांमध्ये स्थायिक होण्यास भारतीय प्राधान्य देत आहेत.

मजबूत पासपोर्ट भारतीय पासपोर्टवर ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. मात्र, यापेक्षा मजबूत पासपोर्ट असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया आदींचा यात समावेश आहे.