शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आदिवासींना जंगलापुरते मर्यादित ठेवून मालकाचा दर्जा का नाकारता?: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 05:39 IST

वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला जातोय; राहुल गांधींची टीका

वायनाड (केरळ) : भाजप आदिवासी समुदायांना जंगलापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना आदिवासीऐवजी वनवासी संबोधून जमिनीचे मूळ मालक म्हणून त्यांचा दर्जा नाकारत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. 

भाजप आदिवासी समाजाला आदिवासीऐवजी वनवासी संबोधून त्यांचा अपमान करते आणि त्यांची वनजमीन उद्योगपतींना देण्यासाठी हिसकावून घेते, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये पक्षाच्या एका रॅलीत केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केला. नल्लूरनाड येथील डॉ. आंबेडकर जिल्हा मेमोरियल कॅन्सर सेंटर येथे एचटी कनेक्शनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

आदिवासींना शिक्षण, नोकऱ्यांची संधी द्या 

- राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही (आदिवासी) जमिनीचे मूळ मालक आहात, हे नाकारणे आणि तुम्हाला जंगलापुरते मर्यादित करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जंगलातील आहात आणि जंगल सोडू नये, ही कल्पना आहे. 

- वनवासी हा शब्द आदिवासी समाजाच्या इतिहासाची आणि परंपरेची विकृती आहे. आमच्यासाठी (काँग्रेस) तुम्ही आदिवासी आहात, जमिनीचे मूळ मालक आहात. आदिवासींना शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय इत्यादी सर्व संधी दिल्या पाहिजेत.

आज पर्यावरण शब्द फॅशनमध्ये आला आहे. आधुनिक समाज  पर्यावरणाची हानी करत आहे. जंगले जाळली जात आहेत, प्रदूषण पसरत आहे. तुमचा इतिहास, जीवनशैली यातूनही आपण शिकू शकतो.  - राहुल गांधी, काँग्रेस नेते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडKeralaकेरळ