शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

केरळ राज्यपालपदी आरिफ खान यांना का निवडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 09:12 IST

मंत्रिमंडळातही हवा प्रतिनिधी; सक्षम, बुद्धिमान नेत्याचा शोध सुरू

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : केरळच्या राज्यपालपदी आरिफ मोहम्मद खान यांना नियुक्त करून नरेंद्र मोदी सरकार या महत्वाच्या राज्यात आपला विस्तार करू इच्छिते याचे संकेत मिळतात. गेल्या आठवड्यात सरकारने खान यांच्यासह पाच राज्यपालांची नियुक्ती केली. जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक हे कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देऊ शकतात तशा भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरिफ मोहम्मद खान यांची निवड केली आहे.

खान हे मूळात काँग्रेसमध्ये होते नंतर ते जनता दलात गेले. तेथून बीकेएस मग बहुजन समाज पक्ष आणि शेवटी २००२ मध्ये भाजपत स्थिरावले. खान यांनी भाजपचाही निरोप घेतला तरी ते बऱ्याच काळापासून मोठ्या राजकीय भूमिकेच्या शोधात होते. अशीच परिस्थिती सत्यपाल मलिक यांची होती. काश्मीरसारख्या मुस्लिम बहुसंख्येच्या राज्यात मोदी यांना राजकीय नेता हवा होता तेव्हा त्यांनी मलिक यांना निवडले.गेल्या काही काळापासून मोदी यांनी केरळवर लक्ष केंद्रीय केले आहे. उदा. मोदी यांनी ए. पी. अब्दुलकुट्टी यांना भाजपत सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. अब्दुलकुट्टी हे प्रमुख मुस्लिम नेते असून गुजरातमधील विकासाच्या मॉडेलची प्रशंसा केल्याबद्दल माकपमधून त्यांना काढून टाकले गेले. मग ते काँग्रेसमध्ये गेले. मोदींची त्यांनी तेथेही प्रशंसा केली म्हणून काँग्रेसने त्यांना निरोप दिला.भाजपमध्ये जाण्याची अब्दुलकुट्टी यांची बाह्यत: इच्छा नव्हती. परंतु, मोदी यांच्या आग्रहास्तव ते भाजपत आले.तलाकबंदी कायद्याला ठाम पाठिंबा

खान यांनी राजकीय पक्ष बदलले; परंतु, तिहेरी तलाक बंदी कायद्याला त्यांनी जो ठामपणे पाठिंबा दिला त्यावर कधी त्यांनी तडजोड केली नाही. एवढेच काय त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमधून राजीनामाही दिला होता.मोदी यांनी खान यांच्यात धैर्य, संयम पाहिला आणि त्यांना संधी दिली. खान हे राज्यसभेत संधी मिळते ते बघत होते. परंतु, मोदी यांची नजर आता केरळवर असल्यामुळे खान यांना त्यांनी तेथे राज्यपाल म्हणून पाठवले. खान हे हाडाचे राजकीय नेते असून ते सक्रिय भूमिका बजावू शकतात.

 

टॅग्स :KeralaकेरळPresidentराष्ट्राध्यक्षtriple talaqतिहेरी तलाक