शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

केरळ राज्यपालपदी आरिफ खान यांना का निवडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 09:12 IST

मंत्रिमंडळातही हवा प्रतिनिधी; सक्षम, बुद्धिमान नेत्याचा शोध सुरू

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : केरळच्या राज्यपालपदी आरिफ मोहम्मद खान यांना नियुक्त करून नरेंद्र मोदी सरकार या महत्वाच्या राज्यात आपला विस्तार करू इच्छिते याचे संकेत मिळतात. गेल्या आठवड्यात सरकारने खान यांच्यासह पाच राज्यपालांची नियुक्ती केली. जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक हे कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देऊ शकतात तशा भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरिफ मोहम्मद खान यांची निवड केली आहे.

खान हे मूळात काँग्रेसमध्ये होते नंतर ते जनता दलात गेले. तेथून बीकेएस मग बहुजन समाज पक्ष आणि शेवटी २००२ मध्ये भाजपत स्थिरावले. खान यांनी भाजपचाही निरोप घेतला तरी ते बऱ्याच काळापासून मोठ्या राजकीय भूमिकेच्या शोधात होते. अशीच परिस्थिती सत्यपाल मलिक यांची होती. काश्मीरसारख्या मुस्लिम बहुसंख्येच्या राज्यात मोदी यांना राजकीय नेता हवा होता तेव्हा त्यांनी मलिक यांना निवडले.गेल्या काही काळापासून मोदी यांनी केरळवर लक्ष केंद्रीय केले आहे. उदा. मोदी यांनी ए. पी. अब्दुलकुट्टी यांना भाजपत सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. अब्दुलकुट्टी हे प्रमुख मुस्लिम नेते असून गुजरातमधील विकासाच्या मॉडेलची प्रशंसा केल्याबद्दल माकपमधून त्यांना काढून टाकले गेले. मग ते काँग्रेसमध्ये गेले. मोदींची त्यांनी तेथेही प्रशंसा केली म्हणून काँग्रेसने त्यांना निरोप दिला.भाजपमध्ये जाण्याची अब्दुलकुट्टी यांची बाह्यत: इच्छा नव्हती. परंतु, मोदी यांच्या आग्रहास्तव ते भाजपत आले.तलाकबंदी कायद्याला ठाम पाठिंबा

खान यांनी राजकीय पक्ष बदलले; परंतु, तिहेरी तलाक बंदी कायद्याला त्यांनी जो ठामपणे पाठिंबा दिला त्यावर कधी त्यांनी तडजोड केली नाही. एवढेच काय त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमधून राजीनामाही दिला होता.मोदी यांनी खान यांच्यात धैर्य, संयम पाहिला आणि त्यांना संधी दिली. खान हे राज्यसभेत संधी मिळते ते बघत होते. परंतु, मोदी यांची नजर आता केरळवर असल्यामुळे खान यांना त्यांनी तेथे राज्यपाल म्हणून पाठवले. खान हे हाडाचे राजकीय नेते असून ते सक्रिय भूमिका बजावू शकतात.

 

टॅग्स :KeralaकेरळPresidentराष्ट्राध्यक्षtriple talaqतिहेरी तलाक