शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

भाजपाने सत्ता काळात का केला नाही विकास?

By admin | Updated: November 24, 2014 02:08 IST

१४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

गुमला/डाल्टनगंज (झारखंड) : १४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. नक्षलवादी समस्या सोडवायची असेल, तर विकास व्हायला हवा आणि खऱ्या विकासासाठी देशातील नैसर्गिक संसाधने लोकांच्या हातात राहायला हवीत़ काँग्रेसने आदिवासी आणि गरिबांना त्यांचा हा अधिकार देण्यासाठी कायम पावले उचलतील, असे सोनिया गांधी रविवारी म्हणाल्या़डाल्टनगंज आणि गुमला येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या़ नक्षल समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित नाही़ राज्यघटनेच्या चौकटीत राहून विकासातून या समस्येला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते आणि देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती सरकारजवळ नव्हे तर लोकांजवळच राहायला हवी़ त्याचमुळे काँगे्रसने आदिवासी, गरीब, दलित, मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांना जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत अधिकार दिले होते़ मात्र, केंद्रातील नव्या भाजपा सरकारने आता या कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे़ यास काँग्रेसचा विरोध आहे़झारखंडमधील समस्या आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला़ त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी लोकांना सांगायला हवे की, राज्यात १४ वर्षांपैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असतानाही समस्या जैसे थे का राहिल्यात? संपुआ सरकार केंद्रात असताना झारखंडमध्ये वीज, रस्ते, पिण्याचे पाणी व आरोग्यसुविधा अशा अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले होते़ मात्र येथील भाजपाशासित सरकारने या निधीचा कुठलाही वापर केला नाही़ भाजपाने १४ वर्षाच्या सत्ता काळात राज्यामध्ये साधी रोजगार निर्मितीही केली नाही. झारखंडमध्ये ४० लाख बीपीएल परिवार आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)