शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

बीफ फेस्टिव्हलचे आयोजन कशासाठी? उपराष्ट्रपती - उपराष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:31 IST

प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का

मुंबई : प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा सवाल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केला.के. ए. पोदार कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाला. राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आ. माधुरी मिसाळ, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन आणि प्राचार्या शोभना वासुदेवन उपस्थित होते.सरकारच्या गोमांसबंदीच्या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, असे ते म्हणाले.पालकांनी पाल्याकडे लक्ष द्यावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. अनेक विद्यार्थी शिक्षण घेताना तणावाखाली असतात. पालकांनी मुलांवरचा ताण ओळखला पाहिजे, असे ते म्हणाले. मुलांवरचा ताण वेळीच ओळखल्यास त्यांना या तणावातून बाहेर काढून त्यांचे भवितव्य घडवण्यास मदत होइल, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.विद्यार्थ्यांशी संवाद साधाताना ते म्हणाले की, आपल्या आईला आणि गुरूंना कधीच विसरू नका. जन्मभूमी, मातृदेशाचा आदर ठेवा. मातृभाषेवर प्रेम करा. मातृभाषेतूनच आपण बोलायला शिकतो. ती भाषा आपल्या सहज लक्षात येते. कारण ती आपली भाषा असते. म्हणूनच तर आपण आपल्या मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे आपले म्हणणे मांडू शकतो. त्यामुळेच मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नका, असे ते म्हणाले.देशातील २५ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे. या जनतेच्या समस्या कशा सोडवता येतील याचा विचार तरुणांनी करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. देशासहजगावर आज दहशतवादाचे मोठ्या प्रमाणावर सावट आहे. ज्याने देशाची संसद उडवण्याचा कट रचला त्या अफजल गुरूचा जयजयकार का, असा संतप्त प्रश्नही नायडू यांनी या वेळी उपस्थित केला....तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का?प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यांच्या आवडीसाठी फेस्टिव्हल आयोजित करण्याची आवश्यकता काय? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा प्रश्नही उपराष्ट्रपती यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू