शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माफी कशासाठी? लोकांचे मुद्दे उपस्थित करणे गुन्हा आहे? शिवसेना नेते अनिल देसाई यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:26 IST

Politics News: राज्यसभेतून  विरोधी पक्षांच्या बारा सदस्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्यानंतरही  शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : राज्यसभेतून  विरोधी पक्षांच्या बारा सदस्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्यानंतरही  शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. निलंबित खासदारांत समावेश असलेले शिवसेनेचे अनिल देसाई यांनी सरकारच्या दुटप्पीपणावर निशाणा साधत  सवाल केला की, माफी कशासाठी?

आम्ही गुन्हा केला का? लोकांचे, शेतकऱ्यांचे, सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित मुद्दे उपस्थित करणे, घोर गुन्हा आहे का? सरकारने आम्हांला ग्वाही दिली होती की,  विमा विधयेक प्रवर समितीकडे पाठविले जाईल; परंतु  त्यांनी सभागृहात विधेयक मांडून मंजूर केले.  त्यांनी महिला खासदारांविरुद्ध बळाचा वापर केला आणि आता ते शिस्तीबाबत उपदेश करीत आहेत; हा विनोदच आहे, असे देसाई यांनी म्हटले. सरकार आणि भाजपला आठवण करून देताना देसाई म्हणाले की, दिवंगत अरुण जेटली हे  राज्यसभेचे नेते आणि विरोधी पक्षनेतेही होते. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर  येऊन  मुद्दे मांडणे  वैध असल्याचे सांगत त्यांनी याचे समर्थन केले होते.

विरोधक भूमिका आणखी कठोर करू शकतातमुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला दोन कारणांंसाठी आपली भूमिका नरम करणे परवडू शकत नाही. पहिले  म्हणजे काँग्रेसचे सहा खासदार निलंबित झाले आहेत आणि दुसरे म्हणजे निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांतील जनतेला चुकीचा संदेश जाऊ शकतो. काँग्रेसशिवाय शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन  खासदारही कारवाईला सामोरे जात आहेत. आगामी निवडणुका बघता विरोधक आपली भूमिका आणखी कठोर करू शकतात.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाईShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा