शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लसीच नाहीत, तर मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारलीच का?; न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:50 IST

Coronavirus Vaccine : दिल्लीत असलेल्या लसींच्या कमतरतेवरून उच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं.

ठळक मुद्देदिल्लीत असलेल्या लसींच्या कमतरतेवरून उच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं.लसींची कमतरता असताना मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू का केली? न्यायालयाचा सवाल.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर लसीकरण हाच पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. देशात सध्या १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, लसींच्या कमतरतेवरून बुधवारी दिल्लीउच्च न्यायालयानंदिल्ली सरकारला फटकारलं. लोकांना ठरलेल्या वेळेत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसी उपलब्ध करून देता येत नसतील तर इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र का सुरू केली, असा सवाल न्यायालायानं केला. तसंच यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितलं आहे. न्यायमूर्ती रेखा पल्ली  यांनी दिल्ली सरकारला एक नोटीस जारी केली य़आहे. तसंच ज्या नागरिकांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना सहा आठवड्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी दुसऱा डोस उपलब्ध करून देऊ शकेल का? असा सवालही केला. दिल्ली उच्च न्यायालयानं अन्य दोन याचिकांसंबधी केंद्र सरकारलाही नोटीस जारी केली आहे. तसंच दिल्लीमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून द्यावा असं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडूनही केंद्राला विचारणा?कोरोना परिस्थिती आणि लसीकरणासंदर्भात देशातील विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केंद्राला केली आहे. देशातील नागरिकांचे लसीकरण डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास आयसीएमआरनं व्यक्त केला आहे. यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. केंद्राने दिलेल्या उत्तरानंतर यासंदर्भात ८ जून रोजी सविस्तर भूमिका मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिकेचं कोविड मॅनेजमेंटचं मॉडेल हे फारच प्रभावी सिद्ध झालं आहे. मुंबई महापालिकेनं खाजगी रूग्णालयांच्या साथीनं आता रहिवासी सोसायट्यांच्या आवारात जाऊन लसीकरण मोहिम सुरु केली आहे. ही निश्चितपणे स्वागतार्ह गोष्ट आहे, अशाच पद्धतीनं आता जे घरात अंथरूणाला खिळून आहेत. त्यांच्याजवळ जाऊन प्रशासनानं लसीकरण करायला हवं, असंही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीIndiaभारतHigh Courtउच्च न्यायालय