शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

धक्कादायक! कुटुंबाने तेरावं केलेला व्यक्ती 15 वर्षांनी घरी परतला अन्...; सांगितली 'ती' घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:08 IST

घरच्यांनीही अनेक वर्षे शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत मानून तेरावं केलं.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एक व्यक्ती 15 वर्षांपूर्वी वयाच्या 37 व्या वर्षी कामाच्या शोधात बाहेर पडला होता. मात्र नागपूरमध्ये तो त्याच्या साथीदारांपासून वेगळा झाला. त्याच्या मित्रांनी त्याला खूप शोधलं पण तो सापडलाच नाही. यानंतर गावातील लोक गावी परत आले. घरच्यांनीही अनेक वर्षे शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत मानून तेरावं केलं. आता 15 वर्षांनंतर ब्रजलाल जिवंत असल्याचं समजलं. 

ब्रजलाल आता आपल्या घरी परतला आहे. यानंतर कुटुंबीयांना फार आनंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रजलाल हा बालाघाट येथील नक्षलग्रस्त पोलीस चौकी पाथरी येथील लेहंगाकन्हार ग्रामपंचायत सोमटोला येथील रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी तो आपल्या गावातील काही लोकांसह महाराष्ट्रातील नागपूर येथे मजूर म्हणून गेला होता. तेथे काही दिवस काम केल्यानंतर तो भरकटला.

ब्रजलालला फारसं काही समजत नव्हतं. त्यामुळे इतके दिवस केरळ, छत्तीसगड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी भटकल्यानंतर तो झारखंडमधील जमशेदपूरला पोहोचला, तिथे तो आजारी अवस्थेत भटकत होता. जमशेदपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून ब्रजलालच्या राहण्याची व्यवस्था केली.

ब्रजलाल गेल्या 8 महिन्यांपासून जमशेदपूरमध्ये राहत होता. आजारपणातून बरं झाल्यानंतर ब्रजलाल जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याने त्याविषयची माहिती दिली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजातील लोकांशी संपर्क साधला. यावेळी ब्रजलाल हा बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.

ब्रजलालच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले. प्रशासनाच्या मदतीने ब्रजलाल घरी परतला आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. ब्रजलाल आता 52 वर्षांचा आहे. ब्रजलालने नागपुरातील आपल्या मित्रांपासून विभक्त झाल्याची गोष्ट सांगितली आणि आता आपल्या कुटुंबाला भेटून मला खूप आनंद झाला आहे आणि तो पुन्हा कधीही गावाबाहेर जाणार नाही असं म्हटलं आहे.