शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुटुंबाने तेरावं केलेला व्यक्ती 15 वर्षांनी घरी परतला अन्...; सांगितली 'ती' घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:08 IST

घरच्यांनीही अनेक वर्षे शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत मानून तेरावं केलं.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एक व्यक्ती 15 वर्षांपूर्वी वयाच्या 37 व्या वर्षी कामाच्या शोधात बाहेर पडला होता. मात्र नागपूरमध्ये तो त्याच्या साथीदारांपासून वेगळा झाला. त्याच्या मित्रांनी त्याला खूप शोधलं पण तो सापडलाच नाही. यानंतर गावातील लोक गावी परत आले. घरच्यांनीही अनेक वर्षे शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत मानून तेरावं केलं. आता 15 वर्षांनंतर ब्रजलाल जिवंत असल्याचं समजलं. 

ब्रजलाल आता आपल्या घरी परतला आहे. यानंतर कुटुंबीयांना फार आनंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रजलाल हा बालाघाट येथील नक्षलग्रस्त पोलीस चौकी पाथरी येथील लेहंगाकन्हार ग्रामपंचायत सोमटोला येथील रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी तो आपल्या गावातील काही लोकांसह महाराष्ट्रातील नागपूर येथे मजूर म्हणून गेला होता. तेथे काही दिवस काम केल्यानंतर तो भरकटला.

ब्रजलालला फारसं काही समजत नव्हतं. त्यामुळे इतके दिवस केरळ, छत्तीसगड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी भटकल्यानंतर तो झारखंडमधील जमशेदपूरला पोहोचला, तिथे तो आजारी अवस्थेत भटकत होता. जमशेदपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून ब्रजलालच्या राहण्याची व्यवस्था केली.

ब्रजलाल गेल्या 8 महिन्यांपासून जमशेदपूरमध्ये राहत होता. आजारपणातून बरं झाल्यानंतर ब्रजलाल जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याने त्याविषयची माहिती दिली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजातील लोकांशी संपर्क साधला. यावेळी ब्रजलाल हा बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.

ब्रजलालच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले. प्रशासनाच्या मदतीने ब्रजलाल घरी परतला आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. ब्रजलाल आता 52 वर्षांचा आहे. ब्रजलालने नागपुरातील आपल्या मित्रांपासून विभक्त झाल्याची गोष्ट सांगितली आणि आता आपल्या कुटुंबाला भेटून मला खूप आनंद झाला आहे आणि तो पुन्हा कधीही गावाबाहेर जाणार नाही असं म्हटलं आहे.