शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:38 IST

mann ki baat News : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी पावले भविष्यात उचलणार आहोत. यंदाच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला नेत्रदीपक विजय ते राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान अशा अनेक घटनांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत १५ दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली आहे. 

औषधे, लसींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला यंदा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांपैकी आपापल्या भागातील स्वातंत्र्यसेनानींबद्दल युवा पिढीने लेखन करायला हवे, पुस्तके लिहायला हवीत.  जालन्याच्या डॉ. मंत्रींचा ‘मन की बात’मध्ये उल्लेखमोदी यांनी ‘मन की बात’मध्ये जालन्याचे डॉ. स्वप्नील मंत्री यांचा उल्लेख केला. मंत्री म्हणाले की, “मी मोदी यांना रस्ते आणि महिलांच्या सुरक्षेवर सूचना आणि घोषणा पाठवल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंतप्रधानांनी आज लोकांना रस्ते सुरक्षेवर आवाहन केले हा अभिमानाचा मुद्दा आहे.”

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी