शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:38 IST

mann ki baat News : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी पावले भविष्यात उचलणार आहोत. यंदाच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला नेत्रदीपक विजय ते राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान अशा अनेक घटनांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत १५ दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली आहे. 

औषधे, लसींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला यंदा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांपैकी आपापल्या भागातील स्वातंत्र्यसेनानींबद्दल युवा पिढीने लेखन करायला हवे, पुस्तके लिहायला हवीत.  जालन्याच्या डॉ. मंत्रींचा ‘मन की बात’मध्ये उल्लेखमोदी यांनी ‘मन की बात’मध्ये जालन्याचे डॉ. स्वप्नील मंत्री यांचा उल्लेख केला. मंत्री म्हणाले की, “मी मोदी यांना रस्ते आणि महिलांच्या सुरक्षेवर सूचना आणि घोषणा पाठवल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंतप्रधानांनी आज लोकांना रस्ते सुरक्षेवर आवाहन केले हा अभिमानाचा मुद्दा आहे.”

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी