शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

सात फेरे घेत असतानाच नवरदेवाच्या छातीत कळ आली; नवरीला अर्ध्यावरच सोडून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 20:45 IST

नवरदेवाचे स्वत:चे मेडिकल स्टोअर होते. लग्नाच्या दगदगीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सागर : मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नावेळी सात फेरे घेताना नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. यामुळे नवरीसह दोन्ही बाजुच्या वऱ्हाडींना मोठा धक्का बसला आहे. संसारच नाही तर लग्न अर्ध्यावर सोडून नवरदेव गेला आहे. 

लग्नाचे निम्मे विधी झालेले होते, तर निम्मे विधी व्हायचे होते. सात फेरे घेत असताना नवरदेवाच्या अचानक छातीत कळ आली आणि तो खालीच कोसळला. नवरदेवाला चक्कर आली असावी म्हणून त्याला उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, तो काही उठत नसल्याचे पाहून त्याला हॉस्पिटलला हलविण्यात आले. 

ईसीजी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूच्या बातमीने वरातींमध्ये एकच खळबळ उडाली. आनंदाचा क्षण अचानक दु:खात बदलला. नवरीचे आयुष्य लग्न होता होताच बरबाद झाले. हर्षित असे या नवरदेवाचे नाव असून बँडबाजा, घोडागाडी अशा तामझामात लग्न करण्यात येत होते. वराती मध्यरात्रीपर्यंत नाचत होते. रात्री १२ वाजता हार घालण्यात आले. नंतर दोन-तीन तास फोटोसेशन सुरु होते. नवरा-नवरी विश्रांतीसाठी गेले. सकाळी पुन्हा ६ वाजता सात फेरे घ्यायचे होते. 

या दगदगीमुळे नवरदेवाला हार्ट अॅटॅक आल्याचे सांगितले जात आहे. नवरदेवाचे स्वत:चे मेडिकल स्टोअर होते. 

टॅग्स :marriageलग्न