शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:57 IST

भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयात महाराष्ट्राचा खारीचा वाटा उचलला असल्याची भावना राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून होते, हे येथे उल्लेखनीय.

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या गीताप्रमाणे महाराष्ट्राने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा गड मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांत प्रचार केला होता.

दिल्लीचा निकाल म्हणजे भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटची कमाल होय, असे मत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याकडे करोलबाग जिल्ह्याची जबाबदारी होती. दिल्लीची जनता आपच्या अलिबाबा आणि ४० चोरांच्या पक्षाला कंटाळली होती. त्यांना भाजपच्या रूपात पर्याय दिसत होता. भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले. 

या नेत्यांनी केला प्रचार 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आयुष खात्याचे मंत्री प्रतापराव जाधव, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातून लोकसभा आणि राज्यसभेतील भाजपचे खासदार प्रचार करायला होते. यात उदयनराजे भोसले, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, डॉ. हेमंत सावरा, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, संदिपन भुमरे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के आदी नेत्यांनी दिल्लीच्या रणांगणात प्रचार केला.

२४१ खासदारांची ड्युटीराष्ट्रीय मराठा संघाचे आनंद रेखी यांच्यानुसार, दिल्लीत भाजपने पक्षाच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच २४१ खासदारांची ड्युटी लावली होती. ५ तारखेपर्यंत दिल्लीतच थांबा, असे खासदारांना सांगण्यात आले होते.  

टॅग्स :BJPभाजपाAAPआपDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस