शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

"शिकलेल्या मुस्लीम मुलांना हिंदू मुली जाळ्यात ओढतात;" लव्ह जिहादबद्दल माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:13 IST

"हिजाब गरजेचं आहे का नाही हे न्यायाधीश थोडी सांगणार, हे तर मौलाना सांगतील. मौलाना जर कायद्याचे निर्णय द्यायला लागले तर हे योग्य ठरेल का?", कुरैशी यांचा सवाल.

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस.व्हाय. कुरैसी हे आपल्या लव्ह जिहादच्या वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. "माझ्या आणि माझ्या पत्नीमध्ये लव्ह जिहाद आहे. माझ्या घरी माझ्या मुलीदेखील लव्ह जिहाद करतात. प्रेमाची कोणतीही मर्यादा नसते. तसं पाहायला गेलं तर मुस्लीम मुलींना याचं सर्वाधिक नुकसान आहे. शिक्षित मुस्ली मुलांना शिक्षित हिंदू मुली आपल्या जाळ्यात ओढतात. मुस्लीम महिल्यांच्या बाजूनं याकडे कोणीही पाहत नाही," असं कुरैशी म्हणाले.

यावेळी डॉ. कुरैशी यांनी मध्यप्रदेशात लागू करण्यात आलेल्या लव्ह जिहादवरील कायद्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "मुस्लिमांची जितकी बदनामी करण्याचा प्रयत्न करा तितकी कमी आहे. यासाठीच हा कायदा आणण्यात आला. कितीतरी अशा घटना आहेत, त्या मुलगीच सांगते की मी माझ्या मुस्लीम पतीसोबतच राहणार आहे," असंही ते म्हणाले.

'हिजाब कुराणचा भाग आहे का?'"हिजाब हा कुराणचा भाग नाही. परंतु महिला आणि पुरुष दोघांनीही सभ्य कपडे परिधान केले पाहिजे असं त्यात सांगण्यात आलं आहे. महाविद्यालयात यावर बंदीबाबत सांगण्यात आलं. परंतु त्या ठइकाणी गणवेश तर नसतो. शाळेच्या गणवेशात शीखांची पगडी, भांगेत कुंकू लावण्याची परवानगी आहे, तर हिजाबमध्ये काय समस्या आहे. हिजाब गरजेचं आहे का नाही हे न्यायाधीश थोडी सांगणार, हे तर मौलाना सांगतील. मौलाना जर कायद्याचे निर्णय द्यायला लागले तर हे योग्य ठरेल का?," असंही ते म्हणाले.'मुस्लिमांची संख्या तेजीनं वाढतेय का?'मुलाखतीदरम्यान त्यांना हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या तेजीनं वाढतेय का? असा प्रश्नही विचारण्यात आला. "मुस्लीम अनेक मुलांना जन्माला घालतात हा प्रपोगंडा अनेक वर्षांपासून चालत आलाय. चार-चार लग्न केली जातात. हम पाच हमारे पच्चीस असं स्लोगन तयार करण्यात आलं होतं. परंतु संशोधन हे सांगत नाही. मुस्लिमांचं फॅमिली प्लॅनिंग कमी आहे हे सत्य आहे. परंतु त्याचा धर्माशी कोणताही संबंध नाही. १९९१ मध्ये मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू ३० कोटींनी जास्त होतो आणि आता ती संख्या ८० कोटी झाली आहे. यावरून हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त होईल हे कुठे दिसून येतं?," असं प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

"मी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक दिनेश सिंह यांच्याकडून एक मॅथेमॅटिकल मॉडेल बनवून घेतलं होतं. किती कालावधीत मुस्लिमांची मेजॉरिटी होईल हे जाणून घेण्यासाठी ते केलं होतं. मी तर देशाचा पंतप्रधानच बनेन असा विचार केलेला. परंतु त्यांनी सांगितलं १००० वर्षांपर्यंत बनूच शकत नाही," असंही कुरैशी म्हणाले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLove Jihadलव्ह जिहाद